तालिबान आणि काँग्रेस !

अल्पसंख्यांकांना खूश करण्यासाठी, त्यांच्या एकगठ्ठा मतांसाठी हिंदूंना ‘हिंसक’ दाखवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे ध्रुवनारायण यांच्यासारख्यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष न करता हिंदूंनी त्याला वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे ! Read more »

(म्हणे) ‘तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सारखेच !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना मी तालिबानशी केली  होती. धर्माच्या आधारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालतो आणि तालिबानदेखील तेच करत आहे; म्हणून मी संघाची तुलना तालिबानशी केली. भाजप आणि रा.स्व. संघ यांनी कितीही विरोध केला, तरी माझे म्हणणे मी मागे घेणार नाही, असे कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (‘के.पी.सी.सी.’चे) कार्याध्यक्ष आर्. ध्रुवनारायण यांनी स्पष्ट केले आहे. Read more »

महंत श्री किशोर पुरी महाराज यांच्या देहत्यागानंतर राजस्थानमधील काँग्रेस सरकार मेहंदीपूर बालाजी मंदिराचे सरकारीकरण करण्याच्या सिद्धतेत !

जयपूर येथील प्रसिद्ध मेंहदीपूर बालाजी मंदिराचे महंत श्री किशोर पुरी महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर या मंदिराच्या सरकारीकरणाची सिद्धता चालू झाल्याचे सांगण्यात येत आहे. महंत श्री किशोर पुरी महाराज यांच्यानंतर मंदिराचा सांभाळ करणारा कुणी नसल्याने या मंदिराचे सरकारीकरण करण्याचा विचार सरकार करत आहे. Read more »

कर्नाटकमधील काँग्रेसच्या धर्मांध नेत्याच्या मुलाच्या घरावर एन्.आय.ए.ची धाड !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) कर्नाटकमधील काँग्रेसचे दिवंगत नेते बी.एम्. इदिनब्बा यांच्या येथील ‘मास्तीकट्टेमध्ये’ असलेल्या घरावर धाड घातली. Read more »

‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांच्यावर कथित भडकाऊ टिपण्या केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद !

 राज्यातील आमागड येथे काही दिवसांपूर्वी मीणा समाजाच्या लोकांनी भगवा ध्वज फाडल्याच्या प्रकरणी ‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांनी त्यांच्या वाहिनीवरून भडकाऊ टिपण्या केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात जयपूरच्या ट्रान्सपोर्ट नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Read more »

मोहनदास गांधी यांच्या हत्येनंतरच्या महाराष्ट्रातील दंगलीत ५ सहस्र ब्राह्मणांच्या हत्या झाल्या !

चित्पावन ब्राह्मण असलेले पंडित नथुराम गोडसे यांनी ३० जानेवारी १९४८ या दिवशी मोहनदास गांधी यांची हत्या केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणविरोधी दंगली घडवल्या. यात २० सहस्र ब्राह्मणांची घरे आणि दुकाने जाळण्यात आली. २ ते ५ सहस्र ब्राह्मणांच्या हत्या करण्यात आल्या. ही संख्या ८ सहस्रही असू शकते. महिला आणि मुले यांनाही लक्ष्य करण्यात आले. या दंगलीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भाऊ नारायण दामोदर सावरकर यांचीही हत्या करण्यात आली होती. Read more »

राजस्थानमध्ये काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदाराच्या उपस्थितीत मीणा समाजाच्या युवकांनी फाडला श्रीराम लिहिलेला भगवा ध्वज !

राजस्थानच्या आमागड किल्ल्यामध्ये श्रीराम लिहिण्यात आलेला भगवा ध्वज काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार रामकेश मीणा यांच्या उपस्थितीत मीणा समाजातील काही तरुणांनी फाडून फेकून दिला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. Read more »

आसाममध्ये मंदिरांपासून ५ कि.मी.च्या परिसरात गोमांसाची खरेदी आणि विक्री यांवर बंदी येणार !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या शासनाकडून नवे ‘गुरे संरक्षण विधेयक’ विधानसभेत मांडण्यात आले आहे. गुरांच्या संरक्षणार्थ असलेल्या या विधेयकानुसार मुख्यतः हिंदु धर्मीय, जैन, शीख आणि गोमांस न खाणारा समाज रहात असलेल्या भागांत गोमांस किंवा गोमांस उत्पादनांची खरेदी अन् विक्री करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. Read more »

काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांचे ८ लाख ६७ सहस्र रुपयांचे वीज देयक प्रलंबित !

काँग्रेसचे राज्यातील नेते आणि माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिद्धू यांनी ९ मासांचे ८ लाख ६७ सहस्र ५४० रुपयांचे विजेचे देयक थकवले आहे. पंजाब राज्य विद्युत् निगम लिमिटेडच्या संकेतस्थळावर याची माहिती देण्यात आली आहे. Read more »

आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही !

आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही. वर्ष १९७५ ते १९७७ या काळात अनेक संस्थांचा योजनाबद्ध पद्धतीने नाश झाला. आपण भारतीय लोकशाहीचा उद्देश यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प करूया आणि राज्यघटनेत नमूद केलेल्या मूल्यांचे पालन करूया, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​