इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील घटनाक्रम नसून, तो एक प्रेरणादायी आणि भविष्यातील वाटचालीचा ‘दीपस्तंभ’ आहे. तोच इतिहास जर खोटा आणि विकृत करून समाजमनावर बिंबवला गेला, तर राष्ट्र आणि धर्म यांची कधीही भरून न येणारी हानी होऊ शकते. भारतात ब्रिटिशांच्या काळापासून हिंदूंची भावी पिढी नपुंसक आणि चारित्र्यहीन व्हावी, याची पद्धतशीर योजना राबवली जात आहे. त्यासाठी प्रामुख्याने शिक्षणक्षेत्राला केंद्रित करण्यात आले आहे. शालेय पाठ्यपुस्तकांद्वारे हेतूपुरस्सर विकृत इतिहास शिकवला जात आहे. हिंदू जनजागृती समिती समविचारी संघटनांच्या साहाय्याने या इतिहासाच्या विकृतीकरणाच्या विरोधात सातत्याने लढा देत आहे.
इतिहासाला कला म्हणून पालटण्याचा प्रयत्न केलात, तर ती एक विकृती बनते
इतिहास म्हणजे प्रत्यक्ष वास्तव. इतिहास हा इतिहासच असतो. या इतिहासाचे सादरीकरण जसेच्या तसे करणेच आवश्यक असते. इतिहासाला पालटण्याचा प्रयत्न केल्यास ती एक विकृतीच बनते. कलेच्या नावाखाली तुम्ही इतिहासाचे भांडवल बनवायचा प्रयत्न कराल, तर तुम्हाला समाजविरोधाला नक्कीच सामोरे जावे लागते. Read more »
शालेय पाठ्यपुस्तकांतील इतिहासाचे विकृतीकरण
शालेय पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम बनवणार्या एन्.सी.ई.आर्.टी. यांसारख्या काही संस्था, विद्यालये आणि विविध राज्यांतील शिक्षण मंडळे हिंदुविरोधी अन् विकृत इतिहास सादर करतात. हिंदूंचा स्वाभिमान जागृत होऊ नये, यासाठी भारताला सर्वांगाने लुबाडणार्या धर्मांध आक्रमकांचा उदोउदो, क्रांतीकारकांचा अवमान आणि भारताला घडवणार्या छत्रपती शिवरायांसारख्या राजांना नगण्य स्थान, असे या सर्व विकृतीकारांचे धोरण आहे. Read more »
संबंधित बातम्या
पुण्यातील ‘छोटा शेख’ आणि ‘बडा शेख’ हे दर्गे, म्हणजे पुण्येश्वर अन् नारायणेश्वर मंदिर !
काशीतील ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या २ मंदिरांच्या जागेवर छोटा शेख अन् बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत. या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी या पुढच्या काळात लढा उभारला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री. अजय शिंदे यांनी केली. Read more »
ज्ञानवापी मशीद नसून मंदिर आहे !
औरंगजेबाने काशी विश्वेश्वर मंदिराचा काही भाग पाडून तेथे ज्ञानवापी मशीद उभी केली; मात्र ते तेथील धार्मिक स्वरूप पालटू शकले नाहीत; कारण तेथे शृंगारगौरी, भगवान श्री गणेश आणि अन्य हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आजही आहेत. त्यामुळे ही जागा मशीद नाही, अशी माहिती हिंदु पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. Read more »
धार्मिक स्थळाचे स्वरूप ठरवण्याच्या प्रयत्नास प्रतिबंध करता येत नाही !
मंदिरांच्या ठिकाणी मशिदी बांधल्याच्या वक्तव्यांना विरोध करण्याचा प्रयत्न मुसलमान पक्षाकडून केला जात आहे, त्याला यामुळे चाप बसला आहे ! हिंदूंनी आता त्या सहस्रो धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षणाची मागणी केली पाहिजे जी मूळची हिंदूंची आहेत ! Read more »
हिंदूंनी ज्ञानवापी कह्यात घ्यावी ! – तस्लिमा नसरीन
औरंगजेबाने अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. शिवमंदिराच्या विद्ध्वंसानंतर औरंगजेबाने त्या ठिकाणी ज्ञानवापी मशीद बांधल्याचे पुरावे मिळाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. या प्रकरणात हिंदूंनी ज्ञानवापी मशीद कह्यात घ्यावी. Read more »
पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांच्या पुनर्उभारणीचे काम करण्यात चूक काय ?
हिंदू कधीही दुसर्याची हत्या किंवा त्यांच्यावर आक्रमण करत नाहीत. हिंदूंचेच धर्मांतर केले जात आहे. हिंदूंच्या मंदिरांचे मोठ्या प्रमाणात भंजन करण्यात आले. भंजन झालेल्या मंदिरांची पुनर्उभारणी करत असल्यामुळे हिंदूंनाच दोषी ठरवले जात आहे.’’ Read more »