अशी मागणी करण्याची वेळ का येते ? स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांत सत्तेत असलेल्या सर्वपक्षीय सरकारांनी अशी चौकशी का केली नाही ? केंद्र सरकारने वेळ न दवडता अशा प्रकारची समिती स्थापन करून सत्य समोर आणावेे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
नवी देहली – जम्मू-काश्मीरमधील हिंदूंवर, तसेच दलितांवर झालेले अत्याचार यांमागील सत्य समोर आणण्यासाठी सर्वोच्च न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करावी, अशी मागणी हरियाणाच्या रोहतक येथील भाजपचे खासदार अरविंद शर्मा यांनी लोकसभेत केली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ही मागणी केली आहे.
0 thoughts on “काश्मिरी हिंदू, दलित आदींवर झालेल्या अत्याचारांमागील सत्य समोर आणण्यासाठी आयोगाची स्थापना करावी ! – भाजपच्या खासदाराची लोकसभेत मागणी”