Sign Petition : महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे आदी बांधून होणारी अतिक्रमणे तात्काळ हटवावी !

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ! छत्रपती शिवरायांनी आई भवानी आणि गुरु यांचा आशीर्वाद; शौर्य, पराक्रम, गनिमीकाव्याची युद्धनीती आदी स्वकर्तृत्व; तसेच महाराजांवर अतूट निष्ठा असलेल्या मावळ्यांच्या त्यागातून ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना केली. याच हिंदवी स्वराज्यात महाराजांचे 300 हून अधिक ऐतिहासिक गड-किल्ले आहेत. आज गड-किल्ल्यांची दुरवस्था तर होत आहेच, याहून गंभीर म्हणजे गडांचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्रही चालू आहे. एकप्रकारे हा गडांवरील भूमी बळकावण्याचा ‘लँड-जिहाद’च आहे, असे म्हणावे लागेल.

देशभक्‍त आणि धर्मप्रेमी हिंदूंनी या ऑनलाईन याचिकेद्वारा आपल्या मागण्या कराव्या !

देशभक्‍त आणि धर्मप्रेमी हिंदूंना विनंती आहे की कृपया खाली दिलेल्या ‘Send Email’ या बटनवर क्लिक करून आपल्या मागण्या इ-मेलद्वारे मा. मुख्यमंत्री, मा. सांस्कृतिक कार्य विभाग मंत्री, महाराष्ट्रआणि भारतीय पुरातत्त्व खात्याचे महासंचालक यांना पाठवाव्या ! त्यासह या इ-मेलची एक प्रत (Copy) आम्हाला [email protected] या इमेल पत्त्यावर पाठवावी ! 
(Note : ‘Send Email’ हे बटन केवळ मोबाईलवर क्लिक केल्यानेच कार्यान्वित होते. डेस्कटॉप अथवा लॅपटॉपवर चालत नाही !)

Send Email

बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर 100 हून अधिक अनधिकृत आर्सीसी असणारी बांधकामे झाल्याचे हिंदु जनजागृती समितीने एक वर्षभरापूर्वी माहितीच्या अधिकरात उघड केले. त्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी संघटना यांच्यासह राज्यभरात आंदोलनही केले; मात्र ती अतिक्रमणे अद्यापही हटवण्यात आलेली नाहीत. हा अतिक्रमणविरोधी लढा चालू असतांना छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या ‘किल्ले रायगडा’वर अतिक्रमणाच्या माध्यमातून इस्लामी आक्रमण झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. त्या पाठोपाठ शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र असलेल्या कुलाबा किल्ल्यावरही अनधिकृत थडगे उभारण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यासह पुणे जिल्ह्यातील लोहगडावर मुसलमानांकडून अनधिकृत बांधकाम करून ‘उरूस’ साजरा केला जातो. सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असतांना महाराष्ट्र शासनाने अनेक वर्षे त्यावर काहीही कृती केलेली नाही, हे खेदाने नमूद करावेसे वाटते.

हिंदवी स्वराज्याचा कणा असलेले हे शेकडो गड-किल्ले राज्याचा ऐतिहासिक ठेवा आहे. असे असतांना अनेक किल्ल्यांवर धर्मांधांनी अनधिकृत बांधकामे, मजार, प्रार्थनास्थळे उभी करून किल्ल्यांचे ‘इस्लामीकरण’ करण्याचा घाट घातला आहे. छत्रपती शिवरायांनी राज्यातील पाच इस्लामी पातशाह्यांना संपवले, तरी इस्लामी आक्रमणे आजही थांबलेली नाहीत. राज्यातील सर्व गडकोट इस्लामी आक्रमणमुक्त व्हायला हवेत. या किल्ल्याचे पावित्र्य जपणे आणि किल्ल्याचे संवर्धन करणे, हे शासन तथा भारतीय पुरातत्त्व खाते यांचे दायित्व आहे.

या दृष्टीने किल्ले रायगड, कुलाबा किल्ला, विशाळगड आदींप्रमाणे राज्यातील सर्वच गड-किल्ल्यांच्या ठिकाणी अशी अतिक्रमणे झाली आहेत का, याचा अहवाल शासनाला सादर करून ती अतिक्रमणे तत्काळ हटवण्याची प्रक्रिया चालू करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे ही धार्मिक तेढ निर्माण करणारी ठरत आहेत. मुळात इतकी अतिक्रमणे होईपर्यंत पुरातत्व विभागाचे कर्मचारी काय करत होते किंवा येथे अतिक्रमणे करण्यासाठी पुरातत्व विभागातील अधिकार्‍यांचे काही साटेलोटे तर नाही ना, असा येथे प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे ज्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हे घडले, त्यांच्यावर आणि ज्या मुसलमानांनी ही अतिक्रमणे केली, त्या सर्वांवर तत्काळ गुन्हे दाखल व्हायला हवेत, अशी आमची मागणी आहे.

मा. खासदार संभाजीराजे आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नातेवाईक श्री. रघुजीराजे आंग्रे यांनी या प्रकरणी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे पत्रव्यवहार करून आवाज उठवला आहे. तसेच अनेक दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी संघटना यांनीही आवाज उठवला आहे. तरी याची गंभीर दखल घेऊन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने या प्रकरणाची केंद्रीय पथक पाठवून सखोल चौकशी प्रारंभ करावी, अनधिकृत बांधकामे करणार्‍यांवर गुन्हा दाखल करावेत, तसेच सर्व अनधिकृत बांधकामे तात्काळ पाडण्यात यावीत आणि किल्ल्यांचे संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती करत आहे. अन्यथा हिंदु जनजागृती समिती या प्रकरणी देशभरात तीव्र आंदोलन छेडेल. छत्रपती शिवरायांच्या वास्तूंवर होत असलेली अतिक्रमणे कदापि सहन केली जाणार नाहीत, याची गंभीर दखल पुरातत्व विभाग आणि शासन-प्रशासन यांनी घ्यावी. या संदर्भात आपल्याकडून झालेल्या कार्यवाहीविषयी आम्हाला वेळोवेळी कळवण्यात यावे, ही विनंती !



​संबंधित बातम्या

हिंदु जनजागृती समिती आयोजित पुणे येथे ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे शहराजवळील सासवड या गावानजिक असलेल्या मल्हार गडावर १७ मार्चला ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. Read more »

पावनगड (कोल्हापूर) येथील अनधिकृत मदरसा प्रशासनाकडून भुईसपाट !

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडाला लागून असलेल्या पावनगडावरील अनधिकृत मदरसा प्रशासनाने भुईसपाट केला. प्रशासनाने ही कारवाई ५ जानेवारीला मध्यरात्री २ वाजता चालू करून ६ जानेवारीला सकाळी १० वाजेपर्यंत पूर्ण केली. Read more »

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राचीन मंदिराला निधी न देणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सिंधुदुर्ग गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘श्री शिवराजेश्‍वर मंदिरा’साठी राज्य सरकारकडून प्रत्येक मासाला केवळ ५०० रुपये इतका तुटपुंजा भत्ता दिला जात आहे. Read more »

छत्रपती संभाजीनगर येथील वारसास्थळांवरील सर्व अतिक्रमणे हटवणार !

यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासनासह ही ऐतिहासिक स्मारके आणि वारसास्थळांशी संबंधित यंत्रणेशी चर्चा करून अतिक्रमणे हटवली जातील Read more »

हिंदु जनजागृती समिती आणि ‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’ यांच्या पुढाकारातून सिंहगडावर स्वच्छता मोहीम !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील सिंहगडावर १ एप्रिल या दिवशी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मोहिमेत ‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’ येथील शिवप्रेमी सहभागी झाले होते. Read more »

गड-दुर्ग रक्षणासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद !

विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांनी ९ मार्च या दिवशी महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०२३-२०२४ साठीचा १६ सहस्र १२२ कोटी रुपये महसुली तुटीचा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि धार्मिक संवर्धन करणारा अर्थसंकल्प सादर केला. Read more »

सिंधुदुर्ग : यशवंतगडाच्या तटबंदीनजीक अवैध बांधकाम केल्याच्या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा नोंद

तालुक्यातील रेडी येथील यशवंतगडाच्या तटबंदीनजीक अवैध उत्खनन आणि बांधकाम केलेल्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवप्रेमींनी ८ दिवस बेमुदत उपोषण केले होते. त्या वेळी पोलिसांनी ५ जणांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. Read more »

शासनाने महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळ स्थापन करून गड-दुर्गांचे रक्षण आणि संवर्धन करावे !

सध्या गड-दुर्गांची दुरवस्था झालेली असून त्यावर अवैध घरे, कबरी, दर्गे, मशिदी आणि अन्य बांधकामे करून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. ही अतिक्रमणे हटवली गेली नाहीत, तर एक दिवस या गड-दुर्गांचा खरा इतिहास पालटून त्यांचे इस्लामीकरण केले जाईल. Read more »

Know More About this Issue >>

Leave a Comment








Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​