राजस्थानमधील मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात आंदोलन करणार ! – श्री राजपूत करणी सेनेची घोषणा

राजस्थान सरकार मेंहदीपूर येथील प्रसिद्ध बालाजी मंदिराचे सरकारीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने त्याच्या डोक्यातून सरकारीकरणाचा विचार काढून टाकावा. श्री राजपूत करणी सेना मेहंदीपूर बालाजी मंदिर आणि राज्यातील अन्य मंदिरे यांचे सरकारीकरण होऊ देणार नाही. आम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करू, अशी चेतावणी श्री राजपूत करणी सेनेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपालसिंह मकराना यांनी येथे दिली. Read more »

महंत श्री किशोर पुरी महाराज यांच्या देहत्यागानंतर राजस्थानमधील काँग्रेस सरकार मेहंदीपूर बालाजी मंदिराचे सरकारीकरण करण्याच्या सिद्धतेत !

जयपूर येथील प्रसिद्ध मेंहदीपूर बालाजी मंदिराचे महंत श्री किशोर पुरी महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर या मंदिराच्या सरकारीकरणाची सिद्धता चालू झाल्याचे सांगण्यात येत आहे. महंत श्री किशोर पुरी महाराज यांच्यानंतर मंदिराचा सांभाळ करणारा कुणी नसल्याने या मंदिराचे सरकारीकरण करण्याचा विचार सरकार करत आहे. Read more »

तिरुनेलवेली (तमिळनाडू) येथील हिंदूंसाठी पवित्र असलेल्या डोंगरावर धर्मांधांनी चांदतारा काढून ‘अल्लाह’ आणि ‘७८६’ लिहिले !

हिंदूंनी संताप व्यक्त करत ‘राज्याच्या धर्मादाय विभागाने यावर त्वरित कारवाई करावी आणि डोंगर, तसेच मंदिरांचे रक्षण करावे’, अशी मागणी केली आहे. हिंदूंना भीती आहे की, धर्मांध या पवित्र डोंगरावरील मंदिरांच्या परिसरात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. Read more »

तमिळनाडूमध्ये अज्ञातांकडून पंच लिंगेश्‍वर मंदिरातील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड !

चेन्नई  राज्यातील राणीपेट येथील कोंडापूरम् गावात असलेल्या पंच लिंगेश्‍वर मंदिरामधील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली, तसेच मूर्तीवरील कपडे जाळण्यात आले. Read more »

मंदिर परिसरात पूजापाठ होण्याऐवजी तेथे शॉपिंग सेंटर निर्माण झाले आहेत ! – मद्रास उच्च न्यायालय

हिंदूंच्या मंदिरांचा वापर पूजापाठ आदींविषयी होण्याऐवजी तेथे शॉपिंग सेंटर निर्माण झाले आहेत, असे सांगत मद्रास उच्च न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त केली. या वेळी न्यायालयाने प्रशासनाच्या धार्मिक व्यवस्थापन विभागावर कोरडे ओढले. के. सुरेश यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी करतांना कोरडे ओढले. Read more »

केवळ एकच मूल जन्माला घातल्यास हिंदूच हिंदूंची लोकसंख्या न्यून करतील ! – विश्‍व हिंदु परिषद

जर कुटुंबामध्ये एकच मूल असेल, तर हिंदू स्वतःहून हिंदूंची लोकसंख्या न्यून करतील. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणावर विचार करतांना हिंदूंचे प्रभुत्व  कायम राहील, याचा विचार हिंदूंनी केला पाहिजे; कारण हिंदूंच्या लोकसंख्येच्या प्रभुत्वामुळे देशातील राजकारण, धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता यांचे संचालन केले जात आहे, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना मांडले. Read more »

तमिळनाडूच्या स्टॅलिन सरकारला हिंदु मंदिर परंपरेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही ! – अधिवक्ता सीताराम कलिंगा, मद्रास उच्च न्यायालय, तमिळनाडू

भारताच्या इतिहासात राजे-महाराजे मंदिरे स्वतःच्या कह्यात घेऊन चालवत नव्हते, तर ते मंदिरांसाठी भूमी आणि धन दान द्यायचे. त्या काळी मंदिरांचे व्यवस्थापन भाविकच पहात असत; मात्र स्वातंत्र्यानंतर मंदिरांचे धन पाहून ‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकारांनी मंदिरे कह्यात घेण्याचा गैरकारभार केला आहे. प्रत्यक्षात त्यांना हिंदूंची मंदिरे कह्यात घेण्याचा आणि त्यातील परंपरा पालटण्याचा अधिकार नाही. Read more »

तमिळनाडूमधील द्रमुक सरकार हिंदूंच्या ३६ सहस्र मंदिरांत ब्राह्मणेतर पुजार्‍यांच्या नियुक्त्या करणार !

या नियुक्त्या ‘तमिळनाडू हिंदू रिलीजियस अँड चॅरिटेबल इंडॉमेंट डिपार्टमेंट’च्या (हिंदू धार्मिक आणि धर्मादाय संपत्ती विभागाच्या) अंतर्गत येणार्‍या ३६ सहस्र मंदिरांत होणार आहेत. लवकरच ७० ते १०० पुजार्‍यांची पहिली सूची जाहीर करण्यात येणार आहे. या नियुक्त्यांना भाजपने विरोध करतांना म्हटले की, द्रमुकचा पायाच हिंदू विरोधाच्या मूळ विचारसरणीवर आहे. Read more »

मंदिरांची भूमी सदैव मंदिरांकडेच राहील ! – मद्रास उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

मंदिरांना दान देणार्‍यांच्या इच्छेविरुद्ध भूमी कुणाला देऊ नये. भूमी सदैव मंदिरांकडेच राहील. मंदिरांच्या भूमीवर ज्या समुदायातील लोकांचे हित सामान्यतः अवलंबून असते, अशा प्रकरणांमध्ये हा कायदा लागू होणार नाही, असा ऐतिहासिक निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. Read more »

मंदिरांचा कारभार भक्तांच्या माध्यमांतून होण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने लढा उभारायला हवा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

भारतातील वेगवेगळ्या राज्य सरकारांनी अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे कह्यात न घेता केवळ हिंदूंचीच मंदिरे कह्यात घेतली आहेत. हिंदू जागरूक आणि संघटित नसणे, हेच या समस्येचे मूळ कारण आहे. मंदिरे ही पूर्वीपासूनच हिंदूंसाठी एक ऊर्जास्रोत आहेत; मात्र सध्याच्या स्थितीला मंदिरांच्या माध्यमातून हिंदूंना कुठेही धर्मशिक्षण मिळत नाही. अन्य पंथियांना त्यांच्या प्रार्थनास्थळातून धर्मशिक्षण दिले जात आहे. मंदिरे ही काही सामाजिक कार्यासाठी निर्माण केली नसून भाविकांच्या उपासनेसाठी आणि हिंदूंच्या धर्मशिक्षणासाठी असावीत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​