मुंबईत ईदच्या मिरवणुकांमधील प्रकार !

मुंबई – ‘ईद-ए-मिलाद’निमित्त मुसलमानांनी मुंबईमध्ये ठिकठिकाणी काढलेल्या मिरवणुकांमध्ये अक्षरश: हैदोस घातला. हिंदूंबहुल भागांमध्ये हिरवे झेंडे फडकवणे, ‘अल्ला-हू-अकबर’च्या घोषणा देणे, मोठ्या आवाजात ‘डॉल्बी’ (उच्च गुणवत्तेची ध्वनीयंत्रणा) लावणे अशा प्रकारे मुसलमानांनी हुल्लडबाजी केली. परळ-लालबाग मार्गावर हिंदूबहुल भागांतही ‘हिरवे झेंडे फडकवून घोषणा देत हिंदूंना डिवचणार्या धर्मांध मुसलमानांना हिंदूंनी चोप देऊन या भागातून अक्षरश: हाकलून दिले.
🚨 Incident during an Eid procession in Parel, Mumbai!
Hindus united and drove away religious fanatics who were creating a ruckus while chanting “Allahu Akbar” late in the night.
O Hindus, let this unity be seen every time.pic.twitter.com/sUGDMPVvR7
— Sanatan Prabhat (Kannada) (@Sanatan_Prabhat) August 27, 2026
१. २६ ऑगस्टच्या रात्री ९.३० पासून परळ-लालबाग मार्गावर मुसलमान युवकांनी ‘अल्ला-हू-अकबर’च्या घोषणा देत दुचाकीवरून एकावेळी तिघा जणांनी बसून ‘स्टंटबाजी’ केली.
२. मुसलमान युवकांच्या या हुल्लडबाजीमुळे लोकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले होते. हुल्लडबाजी करणार्या मुसलमान युवकांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली.
३. रात्री १२ वाजेपर्यंत हा प्रकार चालू होता. पोलिसांनी समजावूनही मुसलमान युवकांनी त्यांचे न ऐकता अधिकच हुल्लडबाजी करून हिंदूंना उकसवण्याचा प्रयत्न करत होते.
४. हा प्रकार समजताच लालबाग-परळ येथून मोठ्या प्रमाणात हिंदू येथील लक्ष्मी कॉटेज येथे जमा झाले आणि त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. या वेळी मुसलमानांनी हिंदूंवर दगड आणि बाटल्या फेकल्या. त्यामुळे संतप्त हिंदूंनी मुसलमान युवकांना चोप दिला आणि त्यांना पिटाळून लावले.
५. या प्रकारानंतर लालबाग-परळ भागात, तसेच शहरात अन्यत्रही मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
हिंदूंनो, असा संघटितपणा प्रत्येक वेळीच दाखवल्यास धर्मांध मुसलमानांना कायमचा धडा मिळेल ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती
माझगाव येथे श्री गणेशमूर्तीच्या आगमनाच्या मूर्तीवर मुसलमानाकडून अंडी फेकण्यात आली होती. तो मुसलमानांकडून हिंदूंची चाचपणी करण्याचा पहिला प्रयत्न होता. ईदच्या मिरवणुकीद्वारे हिंदुबुहुल परळ-लालबाग भागात शक्तीप्रदर्शन करून पाकिस्तान आणि बांगलादेश प्रमाणे दादागिरी करण्याचा प्रयत्न करून दुसरी चाचपणी करण्यात आली. या वेळी हिंदूंनी त्यांना धडा शिकवला असला, तरी धर्मांध मुसलमान थांबतील, या भ्रमात न रहाता हिंदूंनी डोळ्यात तेल घालून पुढ आक्रमण झाल्यास त्याला सिद्ध रहाणे आवश्यक आहे ! पोलीस काही करतील, याची शाश्वती नसल्याने स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध राहिले पाहिजे ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती
प्रत्येक वेळी ‘भारत हा निधर्मी देश आहे’, असे देशाचे कोडकौतुक करणार्यांना मुसलमानांच्या या भूमिकेविषयी काय म्हणायचे आहे ? आता कुठे गेला सर्वधर्मसमभाव ? तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, मानवतावादी यांची तोंडे आता गप्प असतील ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती







