राष्ट्रगीतांचा मान राखा !

‘जन-गण-मन’ हे भारताचे राष्ट्रगीत (National Anthem) आहे, तर ‘वन्दे मातरम् ।’ हे राष्ट्रीय गीत (National Song) आहे. जाणून घेऊया राष्ट्रगीतांचा मान राखण्यासाठी आणि ‘वन्दे मातरम् ।’ या गीताचा अभिमान बाळगण्यासाठी कुठल्या कृती करायच्या. Read more »

स्वभाषेचा अभिमान बाळगा !

सध्या घरोघरी वडीलधारी मंडळी मातृभाषेत बोलतांना सहजपणे इंग्रजी शब्द वापरतात. स्वभाषेत बोलतांना तोंडातून नकळत परकीय शब्द येऊनही त्याचे दुःख न वाटणे किंवा परकीय शब्द वापरायला आवडणे यांमुळे हळूहळू राष्ट्राभिमान घटायला लागतो. याउलट स्वभाषेतील शब्दांचाच अभिमान बाळगला, तर राष्ट्राभिमान वाढायला लागतो. Read more »

हिंदु संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करा !

आपण फॅशन अन् सुधारणा यांच्या नावाखाली आपल्या संस्कृतीचा सात्त्विक पोषाख विसरलो आहोत. याचे परिणाम किती अनिष्ट होत आहेत, हे आपण पाहूया. Read more »

परदेशी वस्तूंवर बहिष्कार घाला आणि स्वदेशी वस्तू वापरा !

विदेशी कपड्यांनी भरलेला ट्रक छातीचा कोट करून रोखणारा हुतात्मा बाबू गेनू, विदेशी कपड्यांची होळी करणारे स्वा. सावरकर आदी देशभक्तांनी स्वदेशीविषयी जागृती करण्यासाठी केलेल्या त्यागाचे विस्मरण होऊ देऊ नका ! स्वदेशी वस्तूच वापरा !! Read more »

परदेशी नव्हेत, तर स्वदेशी खेळ खेळा !

काही वर्षांपूर्वी ‘दूरदर्शन’वर दाखवले जाणारे हुतुतू (कबड्डी), खो-खो यांसारखे भारतीय खेळ मुले आवडीने पहायचे, तसेच खेळायचेही. सध्या दूरचित्रवाहिन्यांवर क्रिकेट, फूटबॉल यांसारखे परदेशी खेळ सातत्याने दाखवले जात असल्याने मुलांना तेच आवडू लागले आहेत. ते खेळायला लागल्यावर त्या खेळांविषयी नकळत अभिमान वाटायला लागतो. त्यामुळे नकळत राष्ट्राभिमान घटायला लागतो. Read more »

शिवाजी महाराजांच्या गडकोटांना प्रत्यक्ष भेट द्या !

राज्याची स्थापना करताना शिवाजी महाराजांनी अनेक गड कोट बांधले. अनेक गड जिंकले आणि दुरवस्था झालेल्या अनेक किल्ल्यांची डागडुजी करून ते सुस्थितीत आणले. या गडांचा हा इतिहास आपणासमोर आजही बोलका करतात. या गडांवरच इतिहास जन्माला आला आणि यांच्या साहाय्याने स्वराज्य स्थापन झाले. हे गड इतिहासाची साक्ष देतात. महाराजांच्या या शौर्याच्या इतिहासाची आठवण ठेवूया. Read more »

हॅरी पॉटर नको, तर देवतांच्या व वीरांच्या कथा असलेली पुस्तके वाचा !

मुलांनो, हॅरी पॉटरची गोष्ट ही वास्तवतेचा आधार नसलेली काल्पनिक गोष्ट आहे. ही काल्पनिक साहसकथा कधीतरी सत्यात उतरेल काय ? केवळ त्याच्या नादी लागून आपल्या संस्कृतीतील अनमोल ठेवा विसरू नका ! Read more »

‘भारतात सुराज्य स्थापन करणे’, हेच खरे ‘करियर’

तुम्ही राष्ट्रपुरुष, संत आणि राम-कृष्ण यांसारख्या देवता यांचा आदर्श ठेवला, धर्माचरण केले, नैतिक मूल्यांची जपणूक करून शिक्षण घेतले आणि त्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्र अन् धर्म यांच्या सेवेसाठी केला, तर भारतात पुन्हा छत्रपती शिवरायांना अपेक्षित असे ‘हिंदवी स्वराज्य’ (हिंदू राष्ट्र, आदर्श राज्य, रामराज्य) निश्चितच स्थापन होईल. असे ‘सुराज्य स्थापन करणे’, हेच तुमचे खरे ‘करियर’ आहे ! Read more »

पाठ्यपुस्तकांतील राष्ट्रद्रोही आणि खोट्या इतिहासाला विरोध करा !

मुलांना नैतिकतेचे धडे मिळावेत, त्यांचा राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान वाढावा, देशवासियांकडून पूर्वी झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत आदी हेतूंसाठी मुलांना शालेय पाठ्यपुस्तकांतून इतिहास शिकवला जातो. परंतु आजकालच्या पाठ्यपुस्तकांतून हे हेतू काही वेळा डावलले जातात. Read more »

‘धर्म’ हा राष्ट्राचा प्राण असून धर्माचरण करा !

‘धर्म’ हा राष्ट्राचा प्राण आहे. राष्ट्राला धर्माचे अधिष्ठान असेल, राजा अन् प्रजा दोघेही धर्मपालक असतील, तरच ते राष्ट्र सर्व संकटांतून मुक्त अन् सुखी होते. धर्माविषयी प्रेम वाटायला लागले की, धर्माविषयी अभिमान निर्माण होतो. धर्माविषयी अभिमान निर्माण झाला की, धर्मरक्षण करण्याचे बळ आपल्या अंगी येते ! Read more »