सीता-स्वयंवराच्या वेळी भंग पावलेल्या धनुष्यासमवेत झालेले श्रीरामाचे संभाषण !




भंग पावलेले शिवधनुष्य रामाने भूमीवर टाकले. तेव्हा त्याचे धनुष्याशी पुढील संभाषण झाले.

राम : काय वाटते ?

धनुष्य : आनंदच आनंद ! एखाद्या राक्षसाने उचलले असते, तर जन्मभर धनुष्य-बाणांच्या बंधनात पडलो असतो. श्रीरामाने मला मुक्त केले.

राम : पण रामाने भूमीवर टाकले त्याचे काय ?

धनुष्य : रामाच्या पायाशीच टाकले आणि मला पादसेवा करण्याची संधी दिली.

राम : पण तुझे दोन तुकडे केले, त्याचे काय ?

धनुष्य : माझा अहंकार तोडला. माझे दोन तुकडे झाले; पण त्या तुकड्यांमुळे दोन जिवांचे (राम-सीतेचे) मीलन झाले.

– पू. (डाॅ.) वसंत आठवले (अप्पाकाका)

संदर्भ : सनातन निर्मित ग्रंथ, ‘बाेधकथा’

‘बोधकथा’हा ग्रंथ‘ऑनलाईन’ खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a Comment