सध्याच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी भवितव्य (करीयर) घडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेसह मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास
झालेला असणेही आवश्यक आहे. न्यूनगंड, भीती, काळजी, नैराश्य यांसारख्या स्वभावदोषांमुळे मन दुर्बल होते. स्वार्थीपणा, मत्सर, चिडचिडेपणा यांसारख्या दोषांमुळे सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतांनाही सुखी-समाधानी होता येत नाही. जीवनात सतत आनंदी रहाता येण्याकरता आपल्यातील स्वभावदोष दूर करण्यासाठी सातत्याने आणि तळमळीने प्रयत्न करणे आवश्यक असते. स्वभावदोष जाऊन मुलांमधे आंतरिक सुधारणा झाली की, ‘खर्या अर्थाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला’, असे म्हणता येईल.
‘स्वभावदोष-निर्मूलन’ म्हणजे स्वभावदोष दूर करणे. ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ म्हणजेस्वभावदोष दूर करण्यासाठी पद्धतशीरपणे आणि नियमित अवलंबण्याची एक विशिष्ट प्रक्रिया.
१. स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व
अ. सुखी आणि आदर्श जीवन जगता येणे
स्वभावदोषांमुळे कोणती हानी होते, हे आतापर्यंतच्या मागील लेखांतून तुमच्या लक्षात आले असेल. स्वभावदोषांमुळे जीवन दुःखी आणि निराशाजनक होते. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेमुळे दोषांवर नियंत्रण मिळवता येऊन स्वतःमध्ये गुणांचा विकास होतो; म्हणूनजीवन सुखी आणि आदर्श बनते.
आ. व्यक्तीमत्त्वाचा खरा विकास साधता येणे
अनेक मुले स्वतःचेव्यक्तीमत्त्व आदर्श घडवण्यासाठी उच्चशिक्षण घेणे, आवडत्या क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करणे,विविध भाषांचे अध्ययन करणे, स्पर्धा-परीक्षांना बसणे, व्यायाम आणि खेळ यांद्वारे शरीरयष्टी सक्षम करणेयांसारखे विविध मार्ग अवलंबतात. मुलांनो, अनेक स्वभावदोष असलेले व्यक्तीमत्त्व कोणाला आवडेलका ? खरे पहाता, स्वतःतील भित्रेपणा, अबोलपणा, इतरांचा विचार न करणे यांसारखे स्वभावदोष दूरकेल्यामुळे व्यक्तीमत्त्वाचा खरा विकास होतो. असे दोषरहित व्यक्तीमत्त्वच समोरील व्यक्तींवर किंवासमाजात ठसा उमटवू शकते. व्यक्तीमत्त्वाचा विकास होण्यासाठी स्वभावदोष घालवणे अपरिहार्य ठरते.
इ. जीवनातील कठीण प्रसंगांना सहजपणे तोंड देता येणे
अनेक मुलांचे कठीण प्रसंगात मानसिक संतुलन बिघडते. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेमुळे मन एकाग्र आणि खंबीर होण्यासहविवेकबुद्धीही जागृत होते. त्यामुळे कठीण प्रसंगातही स्थिर रहाता येण्यासह अयोग्य किंवा अविचाराने कृतीकरण्यापासून मनाला रोखता येते.
ई. स्पर्धात्मक युगात पुढे (अग्रस्थानी) रहाता येणे
स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे मनाची शक्ती अनावश्यक गोष्टींवर व्यय (खर्च) होत नाही. त्यामुळे व्यक्तीच्या कार्यक्षमतेचा परिपूर्णवापर होतो आणि सध्याच्या स्पर्धात्मक युगात पुढे (अग्रस्थानी) रहाता येते.
२. स्वभावदोषांवर मात करण्यासाठी रूपरेषा
अ. स्वतःमधील स्वभावदोषांची सूची (यादी) बनवणे
आ. स्वभावदोष सारणी (तक्ता) लिहिणे
इ. स्वयंसूचना बनवणे
ई. सूचनासत्रे करणे
उ. शिक्षा किंवा प्रायश्चित्त घेणे
ऊ. नामजप करणे आणि स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रार्थना करणे
ए. दोष-निर्मूलन प्रक्रियेचा आढावा दुसर्याला देणे
बालमित्रांनो, आपल्या आयुष्यात स्वभावदोष-निर्मूलनाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन स्वभावदोष-निर्मूलन करण्याचा दृढनिश्चय करूया.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘स्वभावदोष घालवा आणि आनंदी व्हा !’
आदर्श व्यक्तीमत्त्वाची गुरुकिल्ली असलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवा !
मुलांनो, मनाचे कार्य जाणून घ्या !
स्वभावातील गुण-दोषांचा व्यक्तीमत्त्वावर काय परिणाम होतो ?
स्वतःमधील स्वभावदोषांची सूची (यादी) बनवा !
स्वतःमधील चुका शोधण्यासाठी हे करा !
स्वभावदोष-निर्मूलन सारणी कशी लिहावी ?