श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचे अभंग : १

लाभोनी हा जन्म मंत्रे कां फसावें । आंतचि रिघावें शरण गुरुसी ॥१॥

त्यजुनि शास्त्र शंका मान महत्व लज । वराव पुन्हा राजयोगीमंत्र ॥२॥

देववावा आधईं कांतेसी मग स्वयें । घ्यावा संप्रदाय उपदेश ॥३॥

करो नये विचार जरी आड येती । वाळवेही पती माता पिता ॥४॥

बुड्विती स्वहित तेचि साच वैरी । नेती यमपुरी पुर्वजेंसी ॥५॥

खोवाव कां तारुं अक्षय ब्रह्मदाता । जन्मीचेया कांता पती सर्व ॥६॥

झाले जे अनन्य राजयोगीयांसी । नलगे तयासी करणें योग ॥७॥

होवोनि जीवें दासी राजयोगीयाची । पावावें पद तें ची तयासंगे ॥८॥

नाहीं भरंवसा आयुष्य बुडबुडा । नाशायां बापुडा मग म्हणे ॥९॥

सांगे गुरु तेंचि करावें सर्व देहें । हें करी नोहे हें म्हणे नये ॥१०॥

गात्र शक्ती तारुण्य इंद्रिये जंव तंव ॥ व्हावे देहें देव नोहे मग ॥११॥

म्हणे जनार्दन सदुरुपायी लोटी । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१२॥