संस्कृत सुभाषिते : ३

परस्परविरोधे तु वयं पञ्च च ते शतम् |

परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम् || युधिष्ठिर महाभारत

अर्थ : एकमेकात भांडण झाल्यास, आपण [पांडव] पाच आणि ते कौरव शंभर आहेत. पण दुसऱ्या [शत्रूशी] युद्ध असताना आपण एकशे पाच [पांडव अधिक कौरव] आहोत.

गुणेष्वनादरं भ्रातः पूर्णश्रीरपि मा कृथाः |


सम्पूर्णोऽपि घटः कूपे गुणच्छेदात्पतत्यधः ||

अर्थ : हे बन्धो, अतिशय श्रीमंत असलास तरी गुणांचे [संवर्धन करण्यात] दुर्लक्ष करू नकोस. घडा [विहिरीतून काढताना पाण्याने] पूर्ण भरला असला तरी गुण [गुण किंवा पोहोऱ्याचा दोर] तुटल्यास खाली कोसळतो.
जगतीह बन्धुभावं विजयं जयं च लभताम् |


मम राष्ट्रमानचिह्नं राष्ट्रध्वजं नमामि ||

अर्थ : या जगामध्ये बंधुभाव [प्रेम] पसरो. [सत्याचा निश्चितपणे] विजय होवो. [मी] राष्ट्राचे मानचिह्न असणाऱ्या राष्ट्रध्वजाला वन्दन करतो.


अकुतोभयं मनो मे, त्वयि नित्यमेव रमताम् |


सत्यं शिवं च हृद्यं , लब्धुं सदा प्रयतताम् ||

अर्थ : अत्यंत निर्भय असे माझे मन तुझ्या [निरीक्षणात] नेहमी आनंदी होवो नेहमी शाश्वत सत्य, मनोहर कल्याण मिळवण्याचा प्रयत्न करो.


मरुता प्रकम्पमानं, उच्चैर्विराजमानम् |


रुचिरं त्रिवर्णकान्तं, राष्ट्रध्वजं नमामि ||

अर्थ : तेजस्वी अशा, तीन रंगानी शोभून दिसणाऱ्या, [खूप] उंचावर वाऱ्याच्या वेगामुळे फडफडणाऱ्या राष्ट्रध्वजाला मी वन्दन करतो.


कोलाहले काककुलस्य जाते विराजते कोकीलकूजितं किम् |


परस्परं संवदतां खलानां मौनं विधेयं सततं सुधीभिः ||

अर्थ : कावळ्यांच्या घरट्यात काव काव चालू असताना, कोकीळपक्षाचे कुहू कुहू गायन शोभून दिसते काय? [ते लोपून जाते तसंच] दुष्ट लोक परस्परांशी बोलत असताना विचारी माणसाने गप्प बसावे. [त्यांचा फक्त अपमान होईल]


अल्पाक्षररमणीयं यः कथयति निश्चितं स खलु वाग्मी |


बहुवचनमल्पसारं यः कथयति विप्रलापी सः ||

अर्थ : थोडक्यात आणि सुंदर भाषेत जो सांगतो तो खरोखर [चांगला-फर्डा] वक्ता होय. खूप बडबड करून त्यातून थोडासाच अर्थ निघत असेल तर त्याला वाचाळ म्हणावे.

सन्तश्च लुब्धाश्च महर्षिसंघा विप्राः कृषिस्थाः खलु माननीयाः |


किं किं सामिच्छन्ति तथैव सर्वे नेच्छन्ति किं माधवदाघयानम् ||

अर्थ : चित्रकाव्याच्या विविधप्रकारापैकी ‘ अन्तरालाप ‘ नावाचा एक चमत्कृतिपूर्ण काव्यप्रकार आहे. अन्तरालापाच्या एकच श्लोकात प्रश्न व त्या प्रश्नांची दडलेली उत्तरे असतात. प्रस्तुत श्लोकात सज्जन, लोभी, ऋषीसमूह, ब्राह्मण, शेतकरी आणि मान्यवर हे सहाजण कशाची इच्छा करतात? असा एक प्रश्न आणि या सहाहि जणांना नको वाटणारी एकच गोष्ट कोणती? असा दुसरा प्रश्न विचारला आहे.

सम्पन्नतरमेवान्नं दरिद्रा भुञ्जते सदा |


क्षुत् स्वादुतां जनयति सा चाढ्येषु सुदुर्लभा ||

अर्थ : गरीब लोक नेहमी अतिशय चांगल असं अन्न भक्षण करतात. कारण भूक ही सुंदर चव आणते की जि [गोष्ट] श्रीमंतांच्या बाबतीत दुर्मिळ असते.

पठतो नास्ति मूर्खत्वं जपतो नास्ति पातकम् |


मौनिनः कलहो नास्ति न भयं चास्ति जाग्रतः ||

अर्थ : शिकत राहणाराला मूर्खपणाचा धोका नसतो. जप करणाराला पाप लागण्याचा धोका नसतो. मौन बाळगणाऱ्याला भांडणाची भीती नसते. दक्ष राहणार्याला कसलीच भीती नसते.

Leave a Comment