भास्कराचार्य : न्यूटनच्या शेकडो वर्षे आधी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारे !

भास्कराचार्य (इ.स. १२ वे शतक) यांनी आपल्या सिद्धांतशिरोमणी या ग्रंथात गुरुत्वाकर्षणाबद्दल सांगितले आहे.

आकृष्टिशक्तिश्‍च मही तया यत् खस्थं गुरु स्वभिमुखं स्वशक्त्या ।
आकृष्यते तत् पततीव भाति समे समन्तात् क्व पतत्यंय खे ॥

– सिद्धांतशिरोमणी भुवनकोश ६

अर्थ :ही पृथ्वी तिच्या आकाशातील पदार्थ स्वतःच्या शक्तीने आपल्याकडे खेचून घेते. त्यामुळे आकाशातील पदार्थ पृथ्वीवर पडतो; परंतु ग्रहमंडलामध्ये सर्वच जण एकमेकांना खेचत असल्याने कोणीही खाली पडत नाही.

भास्कराचार्यांचे पिता विश्‍वंभरभट्ट यांच्या जीवनात असाच प्रसंग आला होता. सातही व्याहृतींशी अनुसंधान करणारा कोन अवकाशात सिद्ध होत असतांना जर स्त्रीला गर्भधारणा झाली, तर जन्माला येणार्‍या मुलांना सात व्याहृतींचा भेद घ्यायचे शास्त्र कळेल, हे विश्‍वंभरभट्टांना कळले होते. त्यातून भट्ट भास्कर जन्माला आला. भास्कराचार्य यांचा जन्म ५ व्या शतकात झाला. ते वैदिक ज्योतिषातील तज्ञ होते. गणित अपूर्ण शास्त्र असल्याचे लक्षात आल्यावर भास्कराचार्यांनी यौगिक गणित लिहिले. भास्कराचार्यांनी यौगिक गणित (कालवाचक गणित – वेदातील शब्द) लिहिले. नवीन ग्रहावर गेल्यासच माणसाला ते कळेल.

Leave a Comment