‘खरे शिक्षण कसे हवे ?’ याविषयी स्वामी विवेकानंद यांचे समाजाला उद्धृत करणारे बोल !

स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे काही अमूल्य विचार पुढे देतआहोत.

१. `माणूस’ निर्माण करणारे आणि चारित्र्य घडवणारे शिक्षण हवे

‘आयुष्यभर आत्मसात नझालेला आणि मेंदूत अस्ताव्यस्तपणे कोंबलेला ज्ञानाचा भारा म्हणजे शिक्षण नव्हे ! आपले जीवनघडवणारे, `माणूस’ निर्माण करणारे, चारित्र्य घडवणारे आणि चांगले विचार आत्मसात करण्यासशिकवणारे शिक्षण हवे आहे. तुम्ही ४ – ५ चांगले विचार आत्मसात करून ते आपले जीवन आणिआचरण यांत उतरवलेत, तर अवघे ग्रंथालय मुखोद्गत करणार्‍यापेक्षाही तुमचे शिक्षण सरसच ठरेल !

२. `मनुष्य’ निर्माण करण्यास सर्वथा अयशस्वी
ठरलेले आणि भयंकर दोष निर्माण झालेलेआजचे शिक्षण

आपल्या देशाच्या आध्यात्मिक आणि भौतिक शिक्षणाचा भार आपण घेतला पाहिजे,हे तुमच्या ध्यानात येते का ? आज तुम्हाला मिळत असलेल्या शिक्षणात काही चांगल्या गोष्टी आहेत; पणत्यात एवढे भयंकर दोष आहेत की, त्यांच्यामुळे चांगल्या गोष्टी निरुपयोगी ठरत आहेत. पहिली गोष्ट अशीकी, हे शिक्षण `मनुष्य’ निर्माण करणारे नाही, ते सर्वस्वी अकरणात्मक आहे. अकरणात्मक शिक्षण वानिषेधप्रधान शिक्षण हे मृत्यूहून वाईट होय.’

संदर्भ : शक्तीदायी विचार, स्वामी विवेकानंद (सहावी आवृत्ती), रामकृष्ण मठ, नागपूर

Leave a Comment