भारतीय गोवंशाचे अस्तित्व वाचवणे आवश्यकच !

१. गोवंशाची कृषीविषयक उपयोगिता

१ अ. भारतीय गोवंश आधारीत शेणखत, कंपोस्ट खत वापरून किंवा शेती केल्यास त्या पिकांतून ४०० मिलीग्रॅम मॅग्नेशियम तत्त्व मिळून हृदयविकाराचा धोका टळू शकतो. रासायनिक खते वापरलेल्या शेतातील अन्नधान्यामुळे आवश्यक मॅग्नेशियम तत्त्व मिळत नाही.

१ आ. रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीची पाणी धारक क्षमता १६ प्रतिशत कमी होते. जमिनीची उर्वराशक्ती कायम ठेवणारे सूक्ष्म जीव आणि गांडूळ याची संख्या कायम ठेवणारा ‘ह्यूमस’ नावाचा पदार्थ कमी होतो. शेणखतामुळे ‘ह्यूमस’चे प्रमाण संतुलित राहून सूक्ष्म जीव, गांडूळ जमिनीला सच्छिद्र बनवतात. पाणी धारण क्षमता १६ प्रतिशत वाढवतात. उर्वराशक्ती कायम ठेवतात.

१ इ. रासायनिक किटकनाशकांऐवजी देशी गाईचे ९० प्रतिशत गोमूत्र आणि १० प्रतिशत शेण मिळून फवारणी केल्यास सकस अन्नधान्य, भाजीपाला व फळे प्राप्त होतात.

२. भारतीय गोवंशाची वैशिष्ट्ये

२ अ. भारतीय गोवंश ‘बॉस इंडिकस’ या वर्गात येतो.

१. भारतीय गोवंशाला पाठीच्या सुरुवातीला खोंड आहे. त्यामागे सूर्यकेतू नाडी आणि शिंगांमध्ये आकाशतत्त्व असल्याने सूर्यापासून एक शक्तीस्त्रोत प्राप्त होऊन तो दुधामध्ये ‘कॅरॉटीन’ या स्वरूपात उपलब्ध होतो. त्यापासून ‘व्हिटॅमिन’ ए, ई आणि सुवर्णक्षार Cauriaum Hydrate प्राप्त होते. प्रतिकारशक्ती प्राप्त होते.

२. भारतीय गोवंशाच्या शरीरात घामग्रंथी जास्त आहेत. एका क्युबिक मिलीमिटर कातडीमध्ये १६०० रोम कूप असतात. तसेच पृष्ठभागावरील मांसपेशीचे स्वयंस्फूर्त आकुंचन आणि प्रसरण होते. त्यामुळे उष्तामानातील संतुलन राखून जगामध्ये कुठेही भारतीय गोवंश टिकून राहू शकतो.

३. भारतीय गोवंशाची कातडी सूक्ष्म केसाळ असल्यामुळे बाह्यकृमी प्रभाव अत्यंत कमी होतो.

४. गोमूत्र सेवनाने दुर्दम्य प्रतिकारशक्ती प्राप्त होते. त्यामुळे महागड्या आणि घातक आधुनिक चिकित्सा पद्धतीची गरज भासत नाही आणि पारंपारिक घरगुती चिकित्सेने आरोग्य चांगले राहते.

५. भारतीय गोवंशाची जोपासना करतांना निम्न उर्जापातळी जास्त दूध देणार्‍या गार्इंनाही चारा वैरण जास्त द्यावे लागते. खाद्य कमी लागते. उदा. १० लिटर दूध देणार्‍या देशी गाईला १ किलो खुराक द्यावी लागते.

६. देशी गाईच्या दूधात सूक्ष्म तूपाचे कण ३.७० मायक्रॉन जाडीचे असल्यामुळे ते मेंदूच्या आवरणामधून प्रवेश करू शकतात. तसेच प्रथिने ही ‘बीटा केसीन ए २’ असल्यामुळे तसे ‘ओमेगा ३ व ६ तत्त्व’ यामुळे हे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आरोग्याला उपकारक असून त्यामुळे मानवीय आरोग्य उत्तम राहते.‘संकरीत गायी’च्या दुधामध्ये ४.८७ मायक्रॉन जाडीचे सूक्ष्म तुपाचे कण असून ते मेंदूच्या आवरणातून प्रवेश करू शकत नाहीत. तसेच ‘बीटा केसीन ए १’ प्रथिने असतात. तसेच ‘ओमेगा ३ व ६ तत्व’ नसल्यामुळे सांधेदुखी, डोकेदुखी, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग आणि मस्तिष्क विकार होतात.देशी गार्इंच्या दुधामध्ये ‘सॉलीबर फॉस्फेट’ हे तत्त्व संतुलित प्रमाणात म्हणजे १ मिली लिटरमध्ये १८ मायक्रोग्रॅम असल्यामुळे ते पचायला सोपे जाते. कुठल्याही वयात आणि आजारी व्यक्तीला ही उपकारक आहे. देशी गाईच्या तुपामुळे ‘कोलेस्ट्रॉल’ वाढत नाही.

७. भारतीय गोवंशाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन अमेरिकेने १८३५ मध्ये इंग्लंडमार्गे भारतातून ‘अंगोल’, ‘गीर’, ‘धारपारकर’, ‘सहीवाल’, ‘अंकोला वाटसी’ जातीचे वळू नेऊन गायीची एक जात तयार केली. त्याला ‘ब्राह्मण गाय’ असे म्हणतात. त्या सर्व दृष्टीने उपयुक्त आहेत.

क्युबा या अमेरिकन देशाने ‘सहीवाल गाय’ नेऊन कृषी आणि आर्थिक प्रगती केली. आज जगामध्ये संपूर्ण जैविक शेती करणारा क्युबा हा एकमेव देश आहे. ब्राझीलने ७ वर्षांपूर्वी आपल्या देशातून भारतीय ‘वळू’ नेऊन भरपूर प्रगती केली आहे. आज ब्राझीलचे ९० प्रतिशत पशूधन भारतीय गोवंशावर आधारीत आहे.

‘सहीवाल गायी’ या भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत; परंतु अनेक देशांनी सहीवाल गायी नेऊन त्यांची प्रगती करून घेतली, त्यामुळे या गायींना ‘भारताची राजदूत’ म्हणतात.

– डॉ. श्रीकांत घरोटे

Leave a Comment