पालकांनी पाल्याशी कसे वागावे ?

१. पाल्यावर अधिकार गाजवू नये; तर त्याच्याशी मैत्री करावी.

२. प्रत्येक कृती करण्यास प्रेमाने सांगावे.

३. सांगतांना आपली कृती तपासावी.

४. मुलांकडून खूप अपेक्षा असतात. त्या टाळाव्यात म्हणजे मुलांनाही आणिआपल्यालाही ताण येणार नाही.

५. मुलांना पैशांपेक्षा प्रेम महत्त्वाचे आहे. हे तत्त्व नेहेमी लक्षात घ्यावे.

६. पाल्यासाठी स्वतःचा जास्तीतजास्त वेळ द्यावा.

७. मुलांच्या सर्व समस्या शांतपणे ऐकून घ्याव्यात.

८. स्वतःची चूक झाली असल्यास ती मुलांसमोर मान्य करावी.

९. प्रत्येकाची प्रकृती ही निरनिराळी असल्याने पालकांनी आपल्या मुलाची तुलना कधीहीदुसर्‍या मुलाबरोबर करू नये.

१०. मुलांसमोर त्यांच्याविषयी नकारात्मक बोलू नये. (‘तुला कळत नाही, तुला येतनाही, तुला जमणार नाही, तू कधी शांत होणार ?, याने मला खूप डोक्याला ताप दिलाआहे’, अशी नकारात्मक भाषा वापरल्याने मुलांच्या बालमनावर परिणाम होऊनत्यांच्याशी जवळीक साधता येत नाही.)

११. घरात नवीन आलेल्यांसमोर (पाहुण्यांसमोर) मुलांचे दोष सांगितले जातात. तेथे तेसांगण्याऐवजी मुलांनाच ते प्रेमाने सांगावे.

१२. आपला पाल्य काय करत नाही, हे सांगण्यापेक्षा तो काय चांगले करतो, ते इतरांनासांगावे; मात्र त्याचे अवास्तव कौतुक करू नये.

१३. मुलांकडूनही शिकण्याचा स्थितीत रहाणे.

१४. पालकांनी स्वतः देवभक्ती केली, तसेच स्वतःचे आचरण मुलांसमोर आदर्शठेवल्यास तीही त्याचे अनुकरण करतील.

१५. ‘मुलांचा पालनकर्ता मी नसून भगवंत आहे’, याची जाणीव ठेवावी. (त्यामुळे ताणयेत नाही.)

वरील पद्धतींचे आचरण केल्यास निश्चितच एक चांगली पिढी आपण राष्ट्राच्याउभारणीसाठी घडवू शकतो.

– श्री. गिरीजयव प्रभूदेसाई

Leave a Comment