बांगलादेशात वर्ष २०२१ मध्ये २७३ मंदिरांवर आक्रमणे, तर १५२ हिंदूंच्या हत्या !

  • बांगलादेशामध्ये हिंदूंवरील आघातांची स्थिती

  • हिंदूंवर १ सहस्र ८९८ वेळा आक्रमणे

  • हिंदूंच्या देवतांच्या २ सहस्र १३० मूर्तींची तोडफोड

  • ४११ हिंदु महिलांवर बलात्कार

  • १५१ हिंदूंचे अपहरण

  • पाकिस्तानपेक्षाही अधिक असुरक्षित असलेले बांगलादेशातील हिंदू ! भारतामुळे निर्माण झालेल्या बांगलादेशातील हिंदूंची ही स्थिती भारतातील आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • बांगलादेशासह जगभरातील हिंदूंच्या रक्षणार्थ भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांची भयावहता आणि व्याप्ती पहाता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग, तसेच भारतातील हिंदूंना ‘हिंसक’ आणि ‘असहिष्णू’ ठरवून त्यांना हिणवणारी पाश्‍चिमात्य प्रसारमाध्यमे आता मूग गिळून गप्प आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

गौहत्ती (आसाम) – बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंसाठी वर्ष २०२१ हे वर्ष भीतीचे, हत्यांचे, रक्ताचे आणि अश्रूंचे होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये दुर्गापूजेच्या काळात  हिंदूंवर मोठ्या प्रमाणात होणारे अत्याचार जगाने पाहिले. धर्मांधांनी हिंदूंच्या मंदिरांवर आणि दुर्गादेवीच्या मंडपांवर आक्रमणे केली. ‘बांगलादेश जातिया हिंदू मोहजोत’ संघटनेने वर्ष २०२१ मध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांची आकडेवारी घोषित केली आहे. त्यानुसार धर्मांधांनी वर्ष २०२०-२१ मध्ये ३०१ हिंदूंची हत्या केली. वर्ष २०२० मध्ये १४९, तर वर्ष २०२१ मध्ये १५२ जण मारले गेले. धर्मांधांच्या जमावाने हिंदूंवर १ सहस्र ८९८ वेळा आक्रमणे केली. ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत ३०० टक्क्यांनी अधिक आहे.

१. वर्ष २०२० आणि २०२१ मध्ये एकूण २५५ हिंदूंचे अपहरण करण्यात आले. त्यापैकी वर्ष २०२१ चा आकडा हा १५१ आहे. अपहरण झालेल्या लोकांपैकी ८० टक्के लोक मुली किंवा महिला होत्या.

२. धर्मांधांनी वर्ष २०२१ मध्ये २ सहस्र १३० हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. ही संख्या वर्ष २०२० च्या तुलनेत ५०० टक्के (५ पटींनी) अधिक आहे.

३. वर्ष २०२१ मध्ये २७३ मंदिरांवर आक्रमणे करण्यात आली, जी वर्ष २०२० च्या तुलनेत ७०० टक्क्यांनी वाढली आहेत.

४. धर्मांधांनी वर्ष २०२१ मध्ये ३ सहस्र २५६ हिंदु कुटुंबांना लुटलेे, जे वर्ष २०२० च्या तुलनेत ५०० टक्क्यांनी वाढले आहे.

५. वर्ष २०२१ मध्ये १ लाख २३ सहस्रांहून अधिक कुटुंबांनी नोंदवले आहे की, देशातील धर्मांधांच्या टोळ्यांच्या धमक्यांमुळे त्यांना असुरक्षित वाटत आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत २० पटींहून अधिक आहे.

६. केवळ या एकाच वर्षात धर्मांधांच्या आक्रमणात तब्बल १ लाख ३५ सहस्रांहून अधिक घरे, मंदिरे आणि व्यवसाय यांची हानी झाली आहे.

७. वर्ष २०२१ मध्ये बांगलादेशात ४६ हिंदु महिलांवर बलात्कार करण्यात आला आणि ४११ हून अधिक हिंदु महिलांचा विनयभंग अथवा त्यांच्यावर शारीरिक आक्रमणे करण्यात आली.

८. धर्मांधांकडून ३२ हिंदूंना गोमांस खाण्यास भाग पाडले गेले.

९. वर्ष २०२१ मध्ये किमान ९ सहस्र हिंदु कुटुंबांना धर्मांधांनी बांगलादेश सोडण्यास भाग पाडले, जे मागील वर्षाच्या तुलनेत ५ पट अधिक आहे.

१०. एकंदरीत धर्मांध टोळ्यांनी केलेल्या अत्याचारांमुळे यावर्षी हिंदु समाजाचे जवळपास १ सहस्र १४६ कोटी रुपयांची हानी झाली आहे.

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​