श्री नृसिंह सरस्वती (इ.स. १३७८ ते १४५८)

श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयाचे दुसरे अवतार. श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार. त्यांनीच करंजनगर नावाच्या गावी जन्म घेतला. त्यांच्या वडिलांचे नाव माधवरावव आईचे नाव अंबाभवानीअसे होते. पती-पत्नी दोघेही शिवभक्त होते. मुलाचे नाव जन्मतःचशाळिग्रामदेव असे ठेवले.नंतर मोठ्या थाटानेत्याचेबारसेसाजरे करून नरहरीहे व्यावहारिक नाव विधीपूर्वकठेवण्यात आले.

जन्मतःच हे मूल 'ॐ' कार हाशब्दम्हणूलागले. बालक मोठे होऊलागले. तीन वर्षाचेझाले तरी 'ॐ' काराखेरीजएकही दुसरा शब्द ते बोलत नव्हते.मुलगा सात वर्षाचा झाला तरीही'ॐ' काराशिवाय काहीही बोलू लागला नाही.माधवराव वअंबाभवानीमनातफार कष्टी झाले. त्यांनी शिवपार्वतीची आराधना केली.त्यांच्या कृपाप्रसादाने आम्हाला मुलगा झाला, तोही मुका असावा, या गोष्टीमुळेते पती-पत्नी खूप दुःखी बनली.

एक दिवस अंबाभवानी नरहरीलाजवळघेऊनम्हणाली, ''बाळ,तू अवतारी पुरुष आहेस, युगपुरुष आहेस, असेज्योतिषी सांगतात.आमच्या भाग्याने तूआमच्या घरीजन्मालाआलास.तू जगद्गुरू असावास याबद्दल आमची खात्री झालीआहे. तूशक्तिमान आहेस. तू बोलू का लागत नाहीस? तुझेबोल ऐकण्याचीआमची इच्छा आहे. तेवढी पुरी कर !''मुलाने मातेचे हे उद्गार ऐकून खुणेने सांगितले की, माझी मुंज करून दिलीत की, मलासगळेकाही बोलता येईल !''

व्रतबंधाकरिता मुहूर्त ठरविण्यातआला.सर्वतयारी केली. मुंजीलाचतुर्वेदी ब्राह्मण आमंत्रितकेले.मुंजीचा सोहळापाहण्यासअलोट गर्दी लोटली.माधवरावांनी नरहरीच्या कमरेभोवतीमौजीबंधन केले व ठरलेल्या शुभ मुहूर्तावर त्याच्या कानात गायत्रीमंत्राचा तीन वेळा उच्चार केला. नरहरीनेमनातल्यामानत गायत्री मंत्राचा उच्चार केला. उघडपणे केला नाही. लोकहसले; म्हणाले, ''मुका मुलगा गायत्री मंत्र कायउच्चारणार?''

अंबा भवानी या त्याच्या आईने पहिली भिक्षा देऊन त्याला आशीर्वाद देताच त्याने ऋग्वेदातील प्रथम मंत्राचा स्पष्टपणे उच्चार करून, ऋग्वेद म्हणून दाखवला.दुसरी भिक्षा घालताचयजुर्वेदातील प्रारंभीचा भागव यजुर्वेद म्हणून दाखवला. आईने तिसरी भिक्षाघालताच त्याने सामवेदाचे गायनकरून दाखवले. माधवराव वअंबाभवानी यांना अत्यंत आनंद झाला. मुका मुलगा चारी वेद बोलूनदाखवू लागला, हेपाहून लोक आश्चर्यचकित झाले.

नरहरी आपल्या आईला म्हणाले, ''आई, मला आतानिरोप दे. तीर्थयात्रेला जावे असामीनिश्चय केला आहे. घरोघरी भिक्षा मागून,ब्रह्मचर्याचे पालन करून,वेदाभ्यास करावाअसा माझा मानस आहे.'' हे ऐकून आईला फारच दुःख झाले.

''जेव्हा माझेचिंतन कराल, मला भेटण्याची उत्कंठा वाटेलतेव्हामी तुम्हालामनोवेगानेयेऊनभेटेन.'' असे नरहरीने आश्वासन दिल्यावर त्याच्या आई-वडिलांनी त्याला संन्यासदीक्षाघेण्यासमान्यता दिली.

नरहरी प्रथम काशीक्षेत्र या ठिकाणी गेले. तेथे त्यांनी अध्ययन केले. कृष्ण सरस्वतीयांचा अधिकार जाणून नरहरींनी त्यांच्याकडून दीक्षाघेतली व त्यानंतर तेनृसिंहसरस्वती या नावाने प्रसिध्दझाले.

श्री गुरुनृसिंह सरस्वतींनीदक्षिणेकडीलनिरनिराळ्यातीर्थांनाभेट दिली. नरसोबाची वाडी येथे बारा वर्षे राहूनत्यांनी लोकोद्धाराचेप्रचंड कार्य केले.पुढे ते गुप्त रूपाने संचार करीतगाणगापूरयेथेप्रगट झाले.त्यांचे असंख्य शिष्य होते. श्री गुरूंनी सर्व शिष्यांना बोलाविले आणि सांगितले की, ''आम्ह्ची प्रसिद्धी फार झाली आहे. यापुढे गुप्त राहावे असेमनातआहे. मी तुम्हाला सोडून जात नसून फक्त गुरुरुपाने येथे राहणार आहे.

जे जेअसतीमाझ्याप्रेमीl
त्यांतेप्रत्यक्ष दिसेनयनीl

लौकिकमते अविद्याधर्मी l
जातो श्रीशैल्ययात्रेसी ll

श्री गुरु म्हणाले, ''जे लोक माझी भक्ति करतील, मनोभावे माझे गुणगान करतील, त्यांच्या घरी आम्ही सदैव राहू. त्यांना व्याधी, दुःख आणि दारिद्र्याचे भय असणार नाही. त्यांच्या सर्व मनोकामनांची पूर्ती होईल. माझे चरित्र जे वाचतील त्यांच्या घरी निरंतर लक्ष्मी, सुख व शांति लाभेल, असे सांगून तेत्यांच्या इच्छेनुसार भक्तांनीकेलेल्या फुलांच्या आसनावर बसले.ते आसन नावेसारखेपाण्यात सोडले. भक्तांच्या भावना अनावर झाल्या. ''लौकिकमताने मी जातआहे. तरी भक्तांच्या घरी व गाणगापूरला माझे सान्निध्य सदैव राहील.'' असे श्री गुरूंनी सांगितले.नंतर ते पोचल्यावरप्रसादाची खूण म्हणून फुले वाहत आली.

तूभक्तजनाकामधेनुl मनुष्यदेही अवतरोनुl

तुझा पार न जाणेकवणू l त्रैमूर्ती तूचहोसीll

श्री गुरूंच्या लीलाकथाश्रीगुरूचरित्रात आलेल्या आहेत. आजही श्री गुरुगाणगापुरातच आहेत. भक्तांना ते दर्शन देतात.