एकदा चंद्राने गणपतीच्या रुपाची थट्टा केली, ‘काय तुझे ते मोठे पोट, ते सुपासारखे कान, ती सोंड, ते बारीक डोळे !’ तेव्हा गणपतीने त्याला शाप दिला, ‘यापुढे कुणीही तुझे तोंड पाहणार नाही. जो पाहील त्याच्यावर चोरीचा आळ येईल.’ त्याप्रमाणे चंद्राला कोणीही आपल्यासमोर येऊ देत नव्हते. त्याला कोठेही जाता येईना. एकाकी जीवन जगणे अशक्य असते. तेव्हा चंद्राने तपश्चर्या करून गणपतीस प्रसन्न करून घेतले व उःशाप मागितला. ‘उःशाप देताना मूळ शाप नष्ट होता कामा नये. काही प्रमाणात शाप राहिला पाहिजे व उःशापही झाला पाहिजे. आपणच दिलेला शाप आपण पूर्णपणे नष्ट करणे युक्त नाही’, असा विचार करून ‘गणेश चतुर्थीला कोणीही तुझे दर्शन घेणार नाहीत; पण संकष्ट चतुर्थीला तुझे दर्शन घेतल्याशिवाय कोणीही भोजन करणार नाही’, असा उःशाप गणपतीने चंद्राला दिला.
श्री गणेश जयंती
गणपतीची पूजा कशी करावी ?
विद्यार्थी मित्रांनो, गणपतीची होणारी विटंबना थांबवून त्याच्या कृपेसाठी प्रयत्नरत व्हा !
गणपतीला तुळस न वाहण्याचे कारण
श्री मोरया गोसावी (इ. स. १३७१ ते १५३१)
कथा गौरीची