
श्री वासुदेवानंद सरस्वती (१८५४-१९१४) : हे श्री. टेंब्येस्वामी या नावानेदेखील ओळखले जात. त्यांचे खरे नाव वासुदेव असे होते; तर वडिलांचे नाव गणेशभट्ट, आईचे नाव रमाबाई आणि आजोबांचे नाव हरीभट्ट असे होते. (लुणार) चंद्र दिनदर्शिकेनुसार त्यांचा जन्म सूर्योदयानंतर श्रावण वद्य ५, शालिवाहन शक १७७६, २६घटिकेला झाला.
१८७५साली गोव्याजवळील सावंतवाडी येथील बाबाजीपंत गोडे यांची मुलगी अन्नपूर्णाबाई, वय वर्ष २१ यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. लहानपणापासूनच ते संस्कृत भाषेचे जाणकार आणि अतिशय उत्तम असे विद्वान होते. त्यांची कीर्ती प्रत्येक वर्षी वाढतच होती. नरसोबा वाडी हे एक प्रसिद्ध असे दत्तात्रेयाचे देऊळ. या क्षेत्राला भेट दिल्यानंतर ते वासुदेवानंद सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. जेथे ५०० वर्षापूर्वी श्री नरसिंह सरस्वती हे १२ वर्षे निवास करत होते. श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी ''दत्त महात्म्य'' हा ग्रंथ देखील लिहिला. १८९१ साली त्यांच्या पत्नीच्या मृत्युनंतर अवघ्या १३ दिवसातच ते संन्यासी बनले. त्यांचे गुरु श्रीमंत गोविंदस्वामी यांनी त्यांना संन्यासाची दीक्षा दिली.
( ज्येष्ठ वद्य अमावास्या ) म्हणजेच १९१४ साली ते परमात्म्यात विलीन झाले. नर्मदाकाठी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
संत नामदेव
गोंदवलेकर महाराज
श्रीपाद श्रीवल्लभ
सम्राट विक्रमादित्य यांच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक रत्न म्हणजे महाकवी कालीदास
कृष्णभक्त संत मीराबाई ! (इ.स. १४९९-१५४६)
संत तुकाराम : भागवतधर्म मंदिराचा कळस !