समाजात राष्ट्र आणि धर्म यांचे संस्कार करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे ! – वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय

 उच्च, नीच, धर्म, जाती, गरीब, श्रीमंत असा कोणताच भेद नसलेले सर्वसमावेशक असे एक छत म्हणजे ‘सनातन संस्था’ आहे आणि तिचे मुखपत्र म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’ होय. जसे अन्न, वस्त्र, निवारा या प्रत्येकाच्या प्राथमिक गरजा आहेत, तसेच राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम प्रत्येकामध्ये असणे आवश्यक आहे. हे राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम निर्माण करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे, असे प्रतिपादन आयुष मंत्रालयाचे राष्ट्रीय गुरु आणि कुडाळ येथील प्रथितयश वैद्य सुविनय दामले यांनी केले. Read more »

धर्माचरण केल्याने धर्माची शक्ती मिळून आपले रक्षण होते ! – कु. पूजा धुरी, हिंदु जनजागृती समिती

देव, देश आणि धर्म यांसाठी आपल्यातील आत्मबळ वाढवणे आवश्यक आहे. हनुमंतानेही असुरांशी लढतांना भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा वापर केला होता. ‘युवावर्गच देशात क्रांती घडवू शकतो’, असे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे. आपण धर्माचरण केल्यास धर्माची शक्ती आपल्याला मिळते आणि ती शक्तीच आपले रक्षण करते. Read more »

देशाचे दुसरे विभाजन रोखण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राष्ट्रवाद अनुसरणे आवश्यक ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानातील काळ्या पाण्याच्या शिक्षेची नुकतीच शतकपूर्ती झाली. त्यानिमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट वीर सावरकर : अंदमान कारावासातून सुटकेची शताब्दीपूर्ती’ या विषयावर नुकतेच ‘ऑनलाईन’ चर्चासत्र घेण्यात आले. Read more »

कोरोनासारख्या महामारीतही स्थिर रहाण्यासाठी आणि आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे हा महत्त्वपूर्ण उपाय ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे, हा महत्त्वपूर्ण उपाय आहे. आत्मबळ वाढल्यास व्यक्ती कोरोनासारख्या महामारीतही स्थिर राहू शकते. व्यक्तीला कर्मफलन्यायानुसार प्रारब्ध भोग भोगावे लागतात; परंतु साधना केल्यामुळे प्रारब्ध भोगाची तीव्रता न्यून होते, तसेच ते सुसह्य होते. कोरोनासाठीही साधना करणे, हाच उपाय आहे. कोरोनाच्या बातम्या पाहून अनेकांना ताण येत आहे. Read more »

हिंदूंच्या यात्रांवर लावला जाणारा कर टाळण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता ! – श्री नीलमणिदास महाराज

सत्संगातून हिंदु धर्म आणि संस्कृती यांची माहिती देणे आवश्यक आहे. सर्वांना धर्मशिक्षण देऊन हिंदु राष्ट्रासाठी एक प्रस्ताव सिद्ध करून प्रत्येक ग्रामपंचायतीद्वारे त्याचा ठराव संमत करायला हवा आणि तो सरकारला पाठवला पाहिजे. Read more »

भारत हिंदु राष्ट्र होणार ! – स्वामी आनंद स्वरूप, अध्यक्ष, शंकराचार्य परिषद

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभमेळ्यात लावण्यात आलेले ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्याविषयीचे प्रदर्शन पाहिल्यानंतर माझे ठाम मत झाले आहे की, भारत हिंदु राष्ट्र होणार आहे. आजही हिंदुत्वावर काम करणारे अनेक लोक स्वत:ला निधर्मी समजत आहेत. अशा वेळी समिती आणि संस्था यांच्या वतीने प्रदर्शन, संवाद, प्रवचन, सत्संग या माध्यमातून धर्मप्रचाराचे कार्य प्रभावीपणे चालू आहेे. या कार्याला माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत, असे प्रतिपादन शंकराचार्य परिषदेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांनी येथे केले. Read more »

माझ्या मतदारसंघातील ४७ तरुणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आहेत ! – केरळमधील आमदार पी.सी. जॉर्ज

 माझ्या मतदारसंघातील ४७ तरुणी लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. यात १२ हिंदु आणि ३५ ख्रिस्ती आहेत. त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले कि त्यांना कुठे नेण्यात आले ? हे मात्र मला ठाऊक नाही. मी लव्ह जिहादसाठी धर्माला दोष देत नाही; मात्र देशात धर्मांध आहेत, असे विधान केरळ जनपक्षम् (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे आमदार पी.सी. जॉर्ज यांनी केले आहे. Read more »

वैदिक हिंदु धर्माची कालगणना सर्वश्रेष्ठ आहे ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

गुढीपाडवा, चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला नववर्षारंभ असण्याला नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असून हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. याचा उल्लेख प्राचीन वेदांमधे आहे. संतांचे साहित्य, अभंग, लेख यांमध्येही गुढीचा उल्लेख केलेला आढळतो. आपल्या वैदिक हिंदु धर्माची कालगणना सर्वश्रेष्ठ आहे. हिंदु धर्माची उत्पत्ती होऊन अनेक वर्षे झाली असून हिंदु संस्कृतीला कोट्यवधी वर्षांचा प्राचीन इतिहास आहे, हे लक्षात घेऊन हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडवा सण साजरा करून धर्माचरण करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले. Read more »

आतंकवाद रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा ! – केरळचे आमदार पी.सी. जॉर्ज

भारताला वर्ष २०३० पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी आतंकवाद्यांसमवेत काम करत आहेत. हा प्रयत्न रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले पाहिजे, अशी मागणी केरळ जनपक्षम् (धर्मनिरपेक्ष) या पक्षाचे आमदार पी.सी. जॉर्ज यांनी येथील थोडुपुझा येथे आयोजित एका बैठकीत केले. Read more »

भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हावे, हीच आमची मागणी – महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी, अखनूर, जम्मू-काश्मीर

प्रत्येक देश तेथील धर्माप्रमाणे चालतो; परंतु भारतात तसे होत नाही. जगात एकही ‘हिंदु राष्ट्र’ नाही. भारतही अद्याप ‘हिंदु राष्ट्र’ घोषित झालेले नाही. मोदी सरकारने हे कार्य लवकरात लवकर करावे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​