जिहादी, धर्मांतर आणि गो हत्या मुक्त गोवा निर्माण करा ! – श्री. टी. राजासिंह, आमदार, भाग्यनगर

फोंडा – गोव्यात आता जिहादींचा शिरकाव झाला आहे. गोवा ही भूमी जिहादींचा (जिहादीचा) अड्डा बनायला देऊ नये. गोव्यात बांगलादेशी रोहिंग्या (रोहिंगा) घुसले आहेत. जिहाद्यांना धडकी बसेल अशी कृती झाली पाहिजे. आज मौलवीसुद्धा गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत आणि ही एक चांगली बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करावे आणि यामुळे देशभरात गोहत्या बंद होऊ शकेल. हिंदूंची रक्षा केवळ भगवाच करू शकतो (शकते), असे आवाहन भाग्यनगरचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने जुने बसस्थानक, फोंडा येथे आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ते संबोधित करत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार श्री. राजा सिंह पुढे म्हणाले,‘‘ हिंदू जागृत झाला तर इतिहास बदलू शकतो हे पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भारत हिंदु राष्ट्र घोषित करून देशात जनसंख्या नियंत्रण कायदा करावा. प्रत्येक हिंदूने आठवड्यातील किमान दोन घंटे हिंदु धर्माचा प्रचार करण्यासाठी द्यावे. हिंदु जनजागृती समिती विनामूल्य शिकवत असलेले स्वसंरक्षणा प्रशिक्षणाचे धडे घ्यावे. गोवा सरकारने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ करत असलेले कार्य लक्षात घेऊन त्यांच्याप्रमाणे आपल्या कार्याची दिशा ठरवावी.

छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे गोव्यातील कार्य उल्लेखनीय आहे. गोव्यातील ‘हात कातरो खांब’ आदी गोव्यातील (गोव्यातल) संघर्षाचा इतिहासाविषयी माहिती पर्यटकांना दिली पाहिजे. गोव्यात केवल समुद्रकिनारे आहेत हे पाहण्याची दृष्टी आपणास पालटली पाहिजे. गोव्यात पवित्र प्राचीन मठ आणि मंदिरे आहेत. गोव्याची संस्कृती प्राचीन आहे. याकडे सर्वांचे लक्ष वेधले पाहिजे. गोव्यातील झोपलेल्या हिंदूंना जागे केले पाहिजे. झोपलेला हिंदू जागा न झाल्यास त्यांची पुढील पिढी संपणार हे त्यांनी ध्यानात ठेवावे’’.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले,‘‘ फोंडा येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली तर येथे सांप्रदायिक प्रश्न निर्माण होणार असा अपप्रचार करण्यात आला. घडलेला सत्य इतिहास मांडला तर कम्यूनल कसे होणार? इतिहासात अप्रिय असलेले जे घडले ते तसेच सांगितले पाहिजे. गोमंतक निर्माण करणारा भगवान परशुराम हाच खरा ‘गोयचा सायब’ आहे. हिंदूंवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायला आज बंदी असेल तर आम्ही खरेच स्वतंत्र झाले आहोत का? गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी योग्य आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि आम्हाला विदेशी भाषा नकोत’’.







