चतुःश्लोकी भागवत – हरिकृपा

हरिकृपेशिवाय अनुताप नाहीं

जंव हरी हदयीं कृपा न करी । तंव अनुताप नुपजे शरीरीं ।
त्याची पूर्ण कृपा ज्यावरी । तो विषयीकांकुरीं वीतरागी ॥७२॥

विवेकाविण वैराग्य उठी । तें अपायीं घाली कडेकपाटीं ।
कीं वैराग्यविण विवेक उठी । तो जन्मला पोटी नपुंसक ॥७३॥

विवेकाविण वैराग्य आंधळे । वैराग्याविण विवेक पांगुळें ।
हें एकएका अवेगळें । झाल्याविण नकळे परमार्थ ॥७४॥

जे कृष्णकृपा पूर्ण घडे । तै विवेकवैराग्य समपाडें ।
हदयी वाढती वाडेंकोडें । तै ब्रह्म आतुडे तत्काळ पूर्ण ॥७५॥

वैराग्यविण जे स्थिती । त्यांतें गिळी विषयशक्ती ।
विवेकहीन वैराग्यस्थिती । ते जंतू पडती अंधत्वें ॥७६॥

जें कृष्णकृपा पूर्ण आकळें । तें विवेक वैराग्य एके वेळे ।
जें हदयी वाढे प्रांजळें । तें परब्रह्म लोळे दोंदावरी ॥७७॥

तेणें श्रीनारायणें आपण । ब्रह्मयावरी कृपा केली पूर्ण ।
कमळासनीं बैसोनि जाण । झाला विवेकसंपन्न वीतरागी ॥७८॥

Leave a Comment