साधनेने संचित आणि इच्छा यांचाही नाश होणे

विद्यारण्य स्वामींची परिस्थिती गरिबीची होती; म्हणून अर्थप्राप्तीसाठी त्यांनी गायत्री मंत्राची २४ पुरश्चरणे केली; पण अर्थप्राप्ती झाली नाही. त्या वेळी त्यांनी थकून संन्यास घेतला आणि त्यांना गायत्रीमातेचे दर्शन झाले. देवी म्हणाली, ‘‘मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे ते मागून घे.’’ स्वामी म्हणाले, ‘‘आता मला काही मागायची इच्छा नाही. इच्छा होती, तेव्हा तू प्रसन्न झाली नाहीस. असे कशासाठी झाले ? आता मला काही नको आहे आणि तू तर वर द्यायला आली आहेस.’’ देवी म्हणाली, ‘‘कित्येक पूर्वजन्मांची पापे तुझ्या तपश्चर्येने जळून गेली. मागे वळून पहा. चोवीस पर्वत जे जळत आहेत, ती तुझी पापे होती. ती जळून नष्ट झाली. तुझ्या पापांचा क्षय झाल्यावर लगेचच मी आले.’’

– डॉ. वसंत बाळाजी आठवले (खिस्ताब्द १९९०)

Leave a Comment