अंजनवेल (गोपालगड)

अंजनवेल हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा गोपालगड या नावानेपण ओळखला जातो.


माहिती

हा किल्ला वशिष्ठी नदीच्या मुखावर वसलेला आहे. हा किल्ला अंजनवेल गावाच्या सीमेवर आहे.

इतिहास

हा किल्ला सोळाव्या शतकात विजापूर च्या राजाने बांधला व इ.स. १६६० च्या आसपास शिवाजी महाराजांनी याचे पुनरुज्जीवन केले. या ठिकाणी सापडणार्या एका दगडावर मात्र इ.स. १७०७ हे वर्ष व बांधणार्याचे नाव सिद्दि साट असे लिहिलेले आढळते.