वारुगड

माणागंगा नदी जिथे उगम पावते त्या सीताबाईच्या डोंगरात डाव्या कुशीवर एक किल्ला आहे. त्याचे नाव आहे वारुगड.किल्ला माण तालुक्यात दहिवडीच्या ईशान्येस २० मैलांवर आहे.
इतिहास

किल्ला शिवरायांनी बांधला असे सांगतात.या किल्ल्याचा किल्लेदार परभू जातीचा होता.२०० पहारेकरी व बरीच शिबंदी किल्ल्यावर होती.१८१८ मध्ये सातारच्या राजाच्या फडणीस विठ्ठलपंत याने २०० लोक पाठवून दुस-या बाजीरावाकडून घेतला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

किल्ला हा दोन भागात मोडतो.एक गडाची माची तर दुसरा बालेकिल्ला.

१. वारुगड माची

किल्ल्याच्या माचीवर गेल्यावर समजते की गडाचा घेरा केवढा मोठा आहे.किल्ल्याची माची ही संपूर्ण तटबंदीवेष्टीत आहे.आजही ती ब-याच मोठा प्रमाणावर शाबूत आहे. बालेकिल्ल्यावर जाणारा मार्ग हा या माचीतूनच पुढे जातो.या माचीत शिरण्यासाठी पूर्वी ५ दरवाजे होते.मात्र स स्थितिला दोनच शिल्लक आहे गिरवी जाधववाडी या मार्गेमाचीत प्रवेश करणारी वाट एका दरवाजातून वर येते.तर मोंगळ -घोडेवाडी माचीत प्रवेश करणारी वाट दुस-या दरवाजातून वर येते. माचीवर घरांचे ,वाडांचे अनेक अवशेष आहेत.दोन ते तीन पाण्याची टाकी,तळी सुध्दा आहेत.माचीवर भैरोबाचे जीर्णोध्दारीत मंदिर सुध्दा आहे.मंदिर प्रशस्त असल्याने येथे राहण्याची सोय होऊ शकते.संपूर्ण माची फिरण्यास दोन तास लागतात.

२. बालेकिल्ला
गिरवी जाधववाडीतून माचीवर येणारा रस्ता दरवाजातून पुढे गेल्यावर दोन भागात विभागला जातो.उजवीकडे आणि डावीकडे जाणरा रस्ता माचीवरील घोडेवाडीकडे जातो तर सरळ वर जाणारी वाट १५ मिनिटात बालेकिल्याच्या प्रवेशद्वारापाशी येऊन धडकते.दरवाजाची तटबंदी आजही शाबूत आहे.बालेकिल्यावर पोहचल्यावर समोरच एक सदरेची इमारत आहे.आज ती पूर्णपणे नव्याने बांधून काढलेली आहे.समोरच पाण्याचे टाके व एक विहीर आहे.विहीर ब-याच प्रमाणात बुजलेली आहे. किल्ल्यावरून समोरचा परिसर पाहीला की आपल्याला जाणवते की किल्ला किती मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे.समोरच दिसणारा सीताबाईचा डोंगर , महादेव डोंगररांग हा परिसर दिसतो.संतोषगडवरून सीताबाईच्या डोंगरातून एक वाट वारुगडावर येते.

गडावर जाण्याच्या वाटा

वारुगडावर जायचे असल्यास फलटण गाठावे.फलटण पासून किल्ल्यावर जाण्यास अनेक मार्ग आहेत. वारुगड मुख्यतः दोन भागात विभागला आहे.एक गडाची माची यावर घोडेवाडी नावाची वस्ती आहे. तर दुसरा वारुगडाचा बालेकिल्ला. बालेकिल्ल्यात जाण्यासाठी माचीतूच जावे लागते.माचीत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक गाडीरस्ता आहे जो थेट माचीत जातो तर दुसरा मार्ग म्हणजे पायवाट जी थेट किल्ल्यावर घेऊन जाते.


१. फलटण ते गिरवी
फलटण ते गिरवी अशी एस टी सेवा उपलब्ध आहे.गिरवीतून ५ किमी अंतरावर असणारा जाधववाडा गाठावा.जाधववाडा हे किल्ल्याच्या पाययाचे गाव आहे.येथून वारुगड माचीवर जाण्यास २ तास लागतात.माचीतून बालेकिल्ल्यावर जाण्यास २० मिनिटे पुरतात.

२. फलटण दहीवडी

फलटण दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंर २० किमी अंतरावर मोंगळ नावचा फाटा लागतो.या फाटापासून एक कधा गाडीरस्ता थेट माचीवरील घोडेवाडी वस्तीत घेऊन जातो.मोंगळ ते घोडेवाडी अंतर १५ कि.मी चे आहे. फलटण दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंर २६ किमी अंतरावर बीजवाडी नावचे गाव लागते.या गावातून एक कधा गाडीरस्ता थेट माचीवरील घोडेवाडीत जातो.पुढे हा रस्ता वर सांगतिलेल्या रस्त्याला येऊन मिळतो.


राहण्याची सोय : वारुगडाच्या माचीवर असणा-या भैरवगडाच्या मंदिरात १०० लोंकांची सोय होते.

जेवणाची सोय : जेवणाची सोय आपणच करावी.

पाण्याची सोय : माचीवर बारामही पिण्याचे पाण्याची टाकी आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ : जाधववाडीतून दोन तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी : सर्व ऋतुत जाता येते.