समर्थ रामदासस्वामी

समर्थ रामदासस्वामी

बलशाली आणि चारित्र्यसम्पन्न मानवधर्म हे ज्यांचे उद्दिष्ट असे सार्वकालिक संत ! त्यांच्या वाणीने सुमारे चारशे वर्षांपूर्वी मरगळलेल्या महाराष्ट्राला संजीवनी दिली होती.

आजचा भारत गरीबी, भ्रष्टाचार, दुबळेपणा स्वैराचार, उपभोगवाद, यांच्या जाळ्यात सापडला आहे. विवेक आणि योग्य आचारधर्माची शिकवण देणारे समर्थान्चे विचारच दिशाहीन भरकटणार्‍या आजच्या तरुणाईला योग्य मार्गावर आणू शकतात. आत्मसन्मान, आत्मसंयम, आरोग्य आणि समय व्यवस्थापनाचे भान आणून देणारी श्री रामदासांची शिकवण ही आपली जणू वडिलार्जित संपत्ति ! तिचे आपण संपादन करुया. परमार्थाची कास न सोडता निर्मिलेली खरी व्यवहारवादी आणि त्याच वेळी कर्मयोगी आणि चारित्र्यवान जीवनाची मंत्राक्षरी म्हणजे समर्थवचन !

समर्थ रामदासस्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सज्जनगडावरील स्थानांच्या छायाचित्रांचे भावपूर्ण दर्शन घेऊन समर्थांच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची अनुभूती घ्या !

समर्थांच्या पूजेतील श्रीरामपंचायतन (श्री क्षेत्र सज्जनगड)

भावभक्तीने श्रीरामास पूजिले । हिंदवी स्वराज्यरूपी रामराज्य घडविले ॥
भावपूर्ण वंदन त्या रामरायाच्या चरणी । हिंदु राष्ट्र स्थापना व्हावी भूमंडळी सत्वरी ॥

समर्थांच्या नित्य पूजेतील श्री हनुमंताची मूर्ती

वीरवृत्ती-क्षात्रतेज गेले लयाला । धर्मकार्यार्थ द्यावे बळ आम्हाला ॥

सज्जनगडावर जतन केलेल्या समर्थ रामदासस्वामी यांच्या नित्य वापरातील वस्तू

समर्थांचा राष्ट्र-धर्म । अधर्म्यांचे शोधी वर्म ॥
जाणावे तुम्ही त्याचे मर्म । या वस्तूंचे दर्शन घ्यावे भावपूर्ण ॥

सज्जनगडावरील समर्थांचे बसण्याचे स्थान. येथेच समर्थांनी छत्रपती शिवरायांना राष्ट्र-धर्म रक्षिण्याविषयी मार्गदर्शन केले.

समर्थांचे अनमोल मार्गदर्शन । छत्रपतींचे राष्ट्र-धर्म रक्षण ॥ 
ब्राह्मतेज-क्षात्रतेजाचे मीलन । हिंदवी स्वराज्याचे ते पायाभरण ॥

सज्जनगडावरील समर्थ रामदासस्वामी यांची समाधी

ही पहा ती स्वयंभू समाधी । त्यातून पुनः प्रकटले रामदासस्वामी ।
कृतार्थ झाले कल्याणस्वामी ॥

जांब समर्थ, तालुका घनसावंगी, जिल्हा बीड येथील समर्थ रामदासस्वामी यांच्या जन्मस्थानी उभारलेले समर्थांचे मंदिर

शिव-समर्थ आमुचे प्रेरणास्थान । अवघा हिंदूजन करतो तुम्हास वंदन ॥
क्षात्रतेजासह ब्राह्मतेजाची शिकवण । त्यानेच लाभते धर्मकार्यार्थ स्फुरण ॥

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात