श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिर

केवळ प्रसिद्धीच्या स्टंटसाठी शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाण्याचा अट्टाहास करणार्‍या भूमाता ब्रिगेडी महिलांना ज्याप्रमाणे रोखण्यात आले, त्याचप्रमाणे ७ मार्च या महाशिवरात्रीच्या विशेष पर्वाच्या दिवशी हिंदूंच्या धार्मिक प्रथा-परंपरा मोडण्याच्या उद्देशाने श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गर्भगृहात जाण्याची चेतावणी देणार्‍या भूमाता बिग्रेडी महिलांना सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून रोखतील, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी म्हटले आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक त्र्यंबकेश्‍वर येथे येतात. अशा वेळी ब्रिगेडी आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे जर झाले, तर त्यांचे संपूर्ण दायित्व हे प्रशासनाचे असेल. त्यामुळे पोलीस आणि प्रशासन यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या ब्रिगेडी महिलांना तात्काळ नाशिक जिल्हा बंदी घोषित करावी, असे आवाहन केले आहे.

१. प्रत्येक देवस्थानच्या निरनिराळ्या प्रथा-परंपरा असतात. त्याप्रमाणे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्‍या श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरात हिंदु महिला आणि पुरुष यांना प्रवेश आहे; मात्र गर्भगृहात केवळ सोवळे नेसलेल्या अर्धवस्त्रधारी पुरुषांनाच प्रवेश आहे. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे.

२. या ठिकाणी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधीया आदी मोठी पदे भूषवलेल्या महिलांनी दर्शन घेतांना येथील प्रथापरंपरांचे पालन केले आहे.

३. या गावात रहाणार्‍या १२०० स्थानिक महिलांनीही ही प्रथा मोडू नये; म्हणून स्थानिक प्रशासनाला सह्यांचे निवेदन दिले आहे.

४. भूमाता ब्रिगेडी महिलांना आता कोणताही कामधंदा राहिलेला नसल्यामुळे शनिशिंगणापूर येथे आंदोलनाचा फज्जा उडाल्यानंतर त्र्यंबकेश्‍वर येथे त्यांनी वक्रदृष्टी टाकली आहे.

५. राज्यात बलात्कार, लैगिंक अत्याचार, छेडछाडादी अनेक समस्या असतांना त्या सोडवण्यासाठी हातभार लावण्याऐवजी केवळ प्रसिद्धीची भूक भागवण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक जनता यांना त्या वेठीस धरत आहेत. यामुळेच भूमाता ब्रिगेडमधील अनेक पदाधिकार्‍यांनी तृप्ती देसाई यांचा प्रसिद्धीचा हव्यास पाहून भूमाता ब्रिगेड सोडली आहे.

६. वारंवार असे आंदोलन करून जनतेला वेठीस धरून कोट्यवधी रुपयांची हानी केली जात आहे. यामागे शासनाला अस्थिर करण्यासाठी विरोधी पक्षांची तर फूस नाही ना, हे तपासण्यात यावे.

७. भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनामुळे होणार्‍या आर्थिक हानीची वसुली आणि कठोर कायदेशीर कारवाई प्रशासनाने करावी, अशी आमची मागणी आहे. जेणेकरून अशा प्रकारे भविष्यात अन्यत्र आंदोलनाचा स्टंट करून स्थानिक जनतेला वेठीस धरले जाणार नाही.

महाशिवरात्रीच्या दिवशी ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गर्भगृहात महिलांसह घुसण्याची चेतावणी देणार्‍या तृप्ती देसाई आणि त्यांच्या भूमाता रणरागिणी ब्रिगेडला नाशिक जिल्हाबंदी करण्यात यावी, तसेच या आंदोलनामुळे होणारी संभाव्य आर्थिक हानी त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्याकडून नाशिकचे जिल्हाधिकारी अन् पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की,

१. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी श्रीमती तृप्ती देसाई आणि त्यांच्या भूमाता रणरागिणी ब्रिगेड संघटना महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरण्याचे काम करत आहेत. हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे त्यांच्या महिला पदाधिकार्‍यांनी घोषित केले आहे. त्यातून देसाई यांना महिलांच्या हक्कापेक्षा स्वतःची प्रसिद्ध महत्त्वाची वाटते, हे लक्षात आलेले आहे. आज राज्यासमोर अनेक समस्या असतांना, महिलांवर विविध प्रकारचे अत्याचार घडत असतांना त्याविषयी ब्रही न काढता केवळ हिंदूंच्या धार्मिक प्रथा मोडण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. शनिशिंगणापूर येथे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस अन् प्रशासन यांना मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवावा लागला होता. त्यांच्यामुळे तेथे वारंवार तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे.

२. भूमाता ब्रिगेडच्या या धर्मद्रोही आंदोलनाला विरोध करण्यासाठी आणि पूर्वापार चालत आलेली प्रथा चालू ठेवण्यासाठी त्र्यंबकेश्‍वर येथील १२०० हून अधिक महिलांनीही स्थानिक प्रशासनाला स्वाक्षर्‍यांचे निवेदन दिले आहे. तसेच गावातील अन्य संघटना, मंडळे, पुरोहित संघटना, समस्त ग्रामस्थ यांचीही हीच भूमिका आहे. तसेच हिंदु जनजागृती समितीसह राज्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटनांचीही श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरात पूर्वापार चालत आलेल्या धार्मिक प्रथा-परंपरा जपल्या पाहिजेत, अशीच भूमिका आहे.

३. महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक, श्रद्धाळू श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथे दर्शनासाठी येतात. अतिरेक्यांच्या लक्ष्यस्थानी हिंदूंची प्रमुख देवस्थाने असल्यामुळे तेथे घातपात घडू नये; म्हणून पोलिसांवर मोठे दायित्व असते. अशा वेळी भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे जर झाले, तर त्यांचे संपूर्ण दायित्व हे पोलीस आणि प्रशासन यांचे असेल. त्यामुळे पोलीस आणि प्रशासन यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या तृप्ती देसाई आणि त्यांच्या संघटनेच्या सर्व महिलांना नाशिक जिल्हा बंदी घोषित करावी.

४. ब्रिगेडी संघटनेकडून वारंवार आंदोलने करून जनतेला वेठीस धरले जात आहे. तृप्ती देसाई यांच्या आंदोलनामुळे शनिशिंगणापूर येथे सर्व गावकर्‍यांना दिवसभर सर्व व्यवसाय आणि कामकाज बंद ठेवावे लागले होते. कडेकोट बंदोबस्त ठेवल्यामुळे भाविकांनाही मंदिरापर्यंत पोहोचण्यास अडचण झाली होती. परिणामी शनिशिंगणापूर येथे कोट्यवधी रुपयांची हानी झाली. हे सर्व घडवण्यामागे कोणत्या शक्ती कार्यरत आहेत, हे शोधणे आवश्यक आहे. तसेच ज्याप्रमाणे राजकीय पक्षांचे शहर बंद, जिल्हा बंद आंदोलन केल्यावर त्याची हानीभरपाई प्रशासन राजकीय पक्षांकडून वसूल करते, त्याच धर्तीवर भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनामुळे नाशिक जिल्ह्यात होणारी संभाव्य सर्व आर्थिक हानीची वसुली त्यांच्याकडून कठोरपणे करण्यात यावी.

५. नाशिक जिल्ह्यातील वातावरण बिघडणार नाही, या दृष्टीने प्रशासने आणि पोलीस यंत्रणा यांनी योग्य त्या उपाययोजना स्थानिक जनता अन् संघटना यांना विश्‍वासात घेऊन राबवाव्यात. श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरात पूर्वापार चालत आलेल्या सर्व धार्मिक परंपरा, विधी, प्रथा यांचे संरक्षण होईल, असा निर्णय शासनाने घ्यावा, म्हणजे राज्यातील नव्हे, तर देशभरातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा आणि धार्मिक भावना जपल्या जातील.

त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील ऊर्जास्रोत आणि त्यामुळे निर्माण होणारे परिणाम !

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेशबंदी आहे. असे असतांना स्त्रीमुक्तीचा कांगावा करत धर्मशास्त्राचा अभ्यास नसणार्‍या नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडसह अन्य पुरो(अधो)गामी संघटनांच्या महिलांकडून गर्भागृहात प्रवेश करण्याविषयी चेतावण्या दिल्या जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील ऊर्जास्रोत आणि त्यामुळे निर्माण होणारे परिणाम यांविषयीची माहिती येेथे दिली आहे. Read more »



​संबंधित बातम्या

कोरोनाच्या काळात त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या अधिग्रहित केलेल्या जागेचे भाडे देण्यास नाशिक जिल्हा प्रशासनाचा नकार !

त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडून पैशांची मागणी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देवस्थानाला त्यांच्या दायित्वाची जाणीव करून देणारे पत्र लिहिले आहे. Read more »

‘कोलंबिकादेवी मंदिर आणि गंगाद्वार ट्रस्ट’ प्रकरणात २०० कोटी रुपयांचा भूमी घोटाळा

‘कोलंबिकादेवी मंदिर ट्रस्ट आणि गंगाद्वार ट्रस्ट’च्या शेकडो एकर भूमी घोटाळा प्रकरणात कोलंबिका देवस्थानचे विश्‍वस्त, बांधकाम व्यावसायिक, तत्कालीन तहसीलदार, तलाठी यांसह ३५ जणांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. Read more »

त्र्यंबकेश्‍वर येथे भाविकांची गैरसोय, नगरपालिका उदासीन

भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध न करून देणारे निष्क्रीय प्रशासन ! येथील वाहनतळावर वाहने उभी करण्यास जागा नसते. तेथे कुणी सुरक्षारक्षकही नेमलेला नाही. वाहनधारक एकमेकांशी वाद घालतात. लक्षावधी रुपयांचे वाहन भाविकांना तसेच सोडून आत जावे लागते. Read more »

त्र्यंबकेश्‍वरप्रमाणे बळाचा वापर करून महिलांना दर्ग्यात प्रवेश देण्याचे धारिष्ट्य शासन दाखवणार का ? – कु. प्रतीक्षा कोरगावकर

गाभार्‍यात घुसण्याची भाषा करणार्‍या महिलांना शनिशिंगणापूर, कोल्हापूर आणि त्र्यंबकेश्‍वर येथे केवळ संरक्षणच दिले नाही, तर त्यांना बळजबरी करून प्रवेश मिळवून दिला; मग मशिदी आणि दर्गे यांमध्ये महिलांना प्रवेश नाकारला जात असतांना अन् मुसलमान महिला तेथे प्रवेशासाठी इच्छुक असतांना शासन गप्प का आहे ? Read more »

त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात केवळ सोवळे नेसलेल्या पुरुषांनाच प्रवेश देणार : अधिवक्ता श्रीकांत गायधनी, विश्‍वस्त, त्र्यंबकेश्‍वर मंदिर

श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात केवळ सोवळे नेसलेल्या पुरुषांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती त्र्यंबकेश्‍वर मंदिराचे विश्‍वस्त अधिवक्ता श्रीकांत गायधनी यांनी दिली. Read more »

कोण आहेत तृप्ती देसाई ? वाचा ‘भूमाता ब्रिगेडच्या’ भूमिकेवर सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या गर्भगृहात पुरुषांप्रमाणे महिलांनाही प्रवेश मिळावा म्हणून भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी असफल आंदोलन केले. याला सोशल मीडियावरही मोठया प्रमाणात विरोध झाला. Read more »

त्र्यंबकेश्‍वर येथील ॐ शम्भव प्रतिष्ठानच्या वतीने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे आभार

श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी आंदोलन करणार्‍या नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या महिलांना पोलिसांनी संगमनेरजवळील नांदूर फाट्याजवळ कह्यात घेतले. Read more »

त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील महिलांच्या प्रवेशाविषयी शासन सर्व बाजूंशी संवाद साधून निर्णय घेईल ! – अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्या वेळी पत्रकारांनी त्यांना तृप्ती देसाई यांच्याकडून करण्यात येणार्‍या आंदोलनाविषयी विचारले असता ते म्हणाले, मीदेखील आज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. Read more »

श्री त्र्यंबकेश्‍वरच्या धर्मपरंपरा रक्षणासाठी आम्ही सक्रीय सहभागी होेऊ : स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, अध्यक्ष, षड्दर्शन आखाडा परिषद

नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी भाविकांच्या भक्तीचे निमूर्लन करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पुरो(अधो)गाम्यांचे आंदोलन आणि त्यांच्याकडून दिल्या जाणार्‍या कोणत्याही प्रलोभनांना हिंदु भाविकांनी बळी पडू नये. Read more »

गर्भगृहात महिलांना प्रवेश न देण्याच्या मंदिर देवस्थानच्या भूमिकेस अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा कृतीशील पाठिंबा !

श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी नास्तिकवादी भूमाता ब्रिगेड आणि अन्य पुरो(अधो)गामी महिला संघटना यांनी मंदिर देवस्थानला पत्र पाठवून आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. Read more »