लव्ह जिहादचा इतिहास

१. इस्लामी आक्रमक आणि मोगल सम्राट

‘गेली तेराशे वर्षे धार्मिक उद्देशाने प्रेरित झालेल्या मुसलमानांनी हिंदू मुलींशी प्रेमाने किंवा बलप्रयोगाद्वारे ‘निकाह’ (विवाह) केलेले आहेत. इस्लामी आक्रमकांनी हिंदू स्त्रियांचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांना बुरखा परिधान करणार्‍या ‘बेगमा’ (पत्नी) बनवले किंवा अंतःपुरात (जनानखान्यात) डांबले, हा इतिहास आहे.’

इतिहासातील अशा इस्लामी आक्रमकांची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१ अ. महंमद बिन कासीम

‘वर्ष ७१२ मध्ये आलेला हा मुसलमान लुटारू हिंदुस्थानातील लाखापेक्षा अधिक हिंदू तरुणी ‘लूट’ म्हणून अफगाणिस्तानात घेऊन गेला. याने काबूल आणि कंदाहार येथील पेठांत (बाजारांत) अक्षरशः वस्तूंंचा लिलाव करावा, तसा लिलाव करून त्या हिंदू तरुणी विकल्या.’

१ आ. गझनीचा महंमद

‘याने मथुरा लुटल्यानंतर त्या लुटीसह ७० सहस्र तरुण हिंदू स्त्रिया इस्लामी राष्ट्रांत पाठवल्या. वर्ष १०१४ मध्ये त्याने ठाणेश्वर लुटले, तेव्हा त्या लुटीसह दोन लाख तरुण हिंदू स्त्रिया नेल्या. गझनी येथे प्रत्येक लुटीसह नेण्यात आलेल्या हिंदू स्त्रियांची एकूण संख्या ४ लाखांपेक्षा अधिक आहे. उझबेकिस्तानमधीrल मुसलमान हे याच हिंदू स्त्रियांच्या पोटी जन्मलेली संतती आहेत, असे म्हणतात. महंमदाने गझनी येथील बाजारपेठेत एका मोठ्या स्तंभावर ‘दुख्तरे हिंदोस्तान, नीलामे दो दिनार ।’ या ओळी लिहिल्या होत्या. ‘हिंदुस्थानातील स्त्रियांचा येथे दोन दिनारांत लिलाव (विक्री) होईल’, असा त्याचा अर्थ आहे.’

१ इ. अल्लाउद्दीन खिलजी

‘याने राजा रामदेव राय याला पराभूत करून त्याची आठ वर्षांची कन्या, तसेच शेकडो हिंदू स्त्रिया यांच्यावर अत्याचार केले. वर्ष १२९९ मध्ये गुजरातवरील स्वारीत अल्लाउद्दीनने तेथील राजा करण वाघेला याची राणी कमलादेवी हिला स्वतःची ‘बेगम’ बनवले. चितोडची राणी पद्मिनी हिच्या सौंदर्याविषयी कळल्यावर याने चितोडवर स्वारी केली. त्या वेळी शीलहरण होऊ नये; म्हणून राणी पद्मिनीसह ८,००० स्त्रियांनी जोहार (अग्नीत समर्पित होऊन प्राणत्याग) केला.

१ र्इ. हुमायून

हा बाबराचा कुपुत्र हिंदूंच्या लग्नाच्या वरातीतूनच नववधूला पळवून नेत असे.’

१ उ. अकबर

‘याने रजपूत जोधाबाईचे केलेले अपहरण, ही एक प्रकारची ‘लव्ह जिहाद’ची ऐतिहासिक लहान आवृत्तीच होती’, असे प्रसिद्ध इतिहासकार बिपीन चंद्रा यांचे मत आहे. मोगल साम्राज्याला सर्वाधिक धोका शूर रजपुतांपासूनच होता. हा धोका नष्ट व्हावा, यासाठी मनात कपट ठेवून अकबराने जोधाबाईचे अपहरण केले.’ – ममता त्रिपाठी, स्तंभलेखक

१ उ १. अकबराने बळाने पळवून आणलेली जोधाबाई ही हिंदु धर्माचे पालन करत असल्याचे सांगितले जाणे, ही शुद्ध थाप ! : ‘अकबराची राणी जोधाबाई अखेरपर्यंत हिंदु धर्माचे पालन करत होती. जोधाबाई नित्य पूजा-अर्चा करी आणि तिला प्रसन्न ठेवण्यासाठी अकबर त्या पूजा-अर्चेत कपाळाला गंध लावून सहभागी होई’, अशा कथा नेहमी सांगितल्या जातात. या कथा सांंगणारे ‘मुगले आझम’, ‘अनारकली’ आणि ‘जोधा-अकबर’ असे चित्रपटही निघाले. या कथा म्हणजे शुद्ध इस्लामी थापा आहेत. `तबकात अकबरी’ या अकबरकालीन ग्रंथाप्रमाणे अकबराने जोधाबाईशी इस्लामी पद्धतीने निकाह केला होता. निकाहाच्या वेळी ती मुसलमान झाली आणि तिचे नाव मरीयम जमानी ठेवण्यात आले होते. फत्तेपूर सिक्री येथील तिच्या महालाचे नाव `मरीयमका महल’ असे होते. मृत्यूनंतर तिचे इस्लामी पद्धतीप्रमाणे आग्र्याजवळील ख्वाजाकी सरई येथे दफन केले गेले.’

२. चित्रपटसृष्टी

२ अ. ‘लव्ह जिहाद’ची प्रेरणा देणार्‍या चित्रपटांच्या निर्मितीमागे पाकची गुप्तचर संस्था

‘भारतीय समाजावर चित्रपटांचा असलेला प्रभाव हेरून पाकची गुप्तचर संस्था ‘आयएस्आय’ने ‘लव्ह जिहाद’ला अनुकूल वातावरणनिर्मिती करण्यासाठी १९९० पासून गुन्हेजगताचा माफिया दाऊद इब्राहीमच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीत पैसा गुंतवण्यास आरंभ केला.’

या मंडळींनी चित्रपट निर्मात्यांना ‘मुसलमान नायक आणि हिंदू नायिका’ अशी जोडी असलेले चित्रपट निर्माण करण्यास भाग पाडले. अशा चित्रपटांत मुसलमान नायकांसमवेत (उदा. इमरान हाश्मी, सैफ अली खान, फरदीन खान, सलमान खान यांच्या समवेत) हिंदू नायिकांची प्रणयदृश्ये जाणीवपूर्वक दाखवून हिंदू तरुणींच्या मनात अनैतिक प्रेमभावना जागवल्या जातात. त्यामुळे मोठ्या पडद्यावर दिसणारा मुसलमान नायक आपल्याच परिसरातील मुसलमान युवकात शोधण्याचा प्रयत्न हिंदू तरुणी करतात. त्याचा परिणाम म्हणजे आता हिंदू तरुणींना मुसलमानांशी प्रेमाचे चाळे करण्यात किंवा त्यांच्याशी विवाह करण्यात काहीच अनुचित (गैर) वाटत नाही. याउलट चित्रपटात ‘हिंदू नायक आणि मुसलमान नायिका यांचे प्रेम’, असा विषय असल्यास ते मुसलमानांना खटकते आणि ते त्या चित्रपटाला संघटितपणे विरोध करतात. ‘बाँबे’ चित्रपटाच्या वेळी असे घडले होते.

२ आ. ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेले चित्रपटसृष्टीतील हिंदू कलाकार !

१. शर्मिला टागोर : या बंगाली चित्रपट अभिनेत्रीने टायगर अली खान पतौडी या क्रिकेटपटूशी विवाह केला. विवाहाच्या वेळी शर्मिला टागोर यांचे धर्मांतर करून त्यांचे ‘बेगम आयेशा सुल्ताना’ असे नामकरण करण्यात आले. अभिनेता ‘सैफ’ आणि अभिनेत्री ‘सोहा’ ही त्यांची मुले धर्माने मुसलमान आहेत.

२. सुशीला चरक : चित्रपट-कथाकार सलीम खान यांच्याशी विवाह केल्यानंतर त्या ‘सुशीला’ न रहाता ‘सलमा’ झाल्या. आज अभिनेता असलेली त्यांची सलमान, अरबाज आणि सोहेल ही तीन मुले धर्माने मुसलमान आहेत.

३. गौरी छिब्बर : कर्नल रमेशचंद्र छिब्बर यांची कन्या असलेल्या या चित्रपट निर्मातीने घरचा विरोध असतांना शाहरूख खानशी विवाह केला.

४. रीना दत्त आणि किरण राव : आमीर खान या अभिनेत्याने प्रथम रीना दत्त या चित्रपट निर्मातीशी विवाह केला. दोन मुले झाल्यानंतर त्याने रीना दत्तशी असलेला १९ वर्षांचा संसार मोडीत काढत तिला घटस्फोट दिला आणि किरण राव या चित्रपट दिग्दर्शिकेशी विवाह केला. दूरचित्रवाहिनीवरील एका भेटवार्तेत बोलतांना आमीर खान याने ‘माझी पत्नी जरी हिंदू राहिली, तरी माझी मुले मुसलमान म्हणून ओळखली जातील’, असे स्पष्टपणे सांगितले होते. त्याचा मुलगा आणि मुलगी यांची नावे मुस्लीम पद्धतीची आहेत.

५. अमृता सिंग आणि करीना कपूर : १९९१ मध्ये सैफ अली खान याने अमृता सिंग या अभिनेत्रीशी विवाह केला. इब्राहिम आणि सारा ही मुले झाल्यानंतर १३ वर्षांनी त्याने अमृता सिंगला तलाक दिला. त्यानंतर २००९ मध्ये त्याने करीना कपूरशी प्रेमसंबंध असल्याचे उघडपणे सांगून २०१२ मध्ये तिच्याशी विवाह केला.

सोहेल खान-सीमा सचदेव, अरबाज खान-मलाईका अरोरा, फरदीन खाननताशा मधवानी, इम्रान हाश्मी-परवीन शाहनी, इमरान खान-अवंतिका मलिक, झायेद खान-मल्लिका पारेख, ही याच मालिकेतील काही उदाहरणे आहेत. या इतिहासाचा निष्कर्ष म्हणजे हिंदू तरुणीने मुसलमान पुरुषाशी विवाह केला, तर तिला इस्लाम धर्माचेच पालन करावे लागते आणि तिच्या पोटची मुले पुढे ‘इस्लामचेच बंदे’ होतात.

२ इ. सध्याच्या चित्रपटसृष्टीत एकही मुसलमान अभिनेत्री नाही, हे लक्षात घ्या !

‘पूर्वी चित्रपटसृष्टीत मुमताज, सायरा बानो, वहीदा रेहमान, नर्गिस, झीनत अमान, परवीन बाबी आदी अनेक मुसलमान अभिनेत्री होत्या. सध्या चित्रपटसृष्टीत असलेली सोहा अली खान ही अभिनेत्री हिंदू-मुसलमान मिश्र वंशाची आहे. गुन्हे जगतातील कुख्यात माफिया असलेल्या दाऊदच्या कंपनीने भारतीय चित्रपट उद्योगात मुसलमान मुलींच्या प्रवेशास प्रतिबंध केला आहे. मुसलमान निर्माते अन् दिग्दर्शक यांना मात्र त्यांच्या चित्रपटात हिंदू अभिनेत्रींना घेण्यास अनुमती दिली आहे.’ (साप्ताहिक ‘उदय इंडिया’, २९.१०.२०११)

३. क्रिकेट जगत

संगीता बिजलानी : १९९६ मध्ये क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन याने ९ वर्षांच्या संसारानंतर पत्नी नुरीनला तलाक देऊन संगीता बिजलानी या अभिनेत्रीशी विवाह केला. २०१० मध्ये त्याने संगीतालाही तलाक दिला.

४. राजकीय क्षेत्र

४ अ. पायल नाथ : हिच्याशी १७ वर्षे संसार केल्यानंतर जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी २०११ मध्ये तिला तलाक दिला.

४ आ. डॉ. रुमी नाथ (आसाममधील काँग्रेसच्या आमदार) : ‘दोन वर्षांच्या मुलीची माता असलेल्या डॉ. रुमी यांनी शासकीय नोकरीत असलेल्या जैकी जाकीर या मुसलमानाशी पळून जाऊन निकाह केला. या निकाहासाठी आसामचे एक मंत्री शामिल सिद्दीकी अहमद यांनी साहाय्य केले.’ (दैनिक ‘पुढारी’, २८.५.२०१२)

५. अन्य

५ अ. ‘लव्ह जिहाद’, हेच ज्येष्ठ इंग्रजी लेखिका कमला दास यांनी इस्लाम पंथ स्वीकारण्यामागील कारण !

‘कमला दास यांनी १९९९ मध्ये वयाच्या ६५ व्या वर्षी इस्लामचा स्वीकार केला आणि ‘कमला सुरय्या’ असे मुस्लीम नाव धारण केले. त्यांचा सहलेखक म्हणून काम करणार्‍या एका ३० वर्षीय प्राध्यापक असलेल्या मुसलमानाने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मोठा गाजावाजा करत त्यांनी इस्लाम पंथ स्वीकारला. इस्लाम स्वीकारताच त्यांनी घरातील सर्व हिंदु देवतांची चित्रे काढून टाकलीr. २००६ मध्ये ‘द हिंदू’ या वृत्तपत्राला दिलेल्या एका भेटवार्तेमध्ये कमला दास यांनी आपण धर्मपरिवर्तन करून पुष्कळ काही गमावल्याची स्वीकृती दिली होती.’ – डॉ. श्रीरंग गोडबोले, पुणे

‘कमला दास यांना पुन्हा हिंदु धर्मात परत येण्याची इच्छा होती; पण असे केल्याने त्यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या मोठ्या मुलाने त्यांना तसे न करण्यास सांगितले. कमला दास यांना त्यांच्या सहलेखक मुसलमानाने इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आखाती राष्ट्रातून आलेले १ कोटी रुपये दिले होते. याविषयी माझ्याकडे कागदी पुरावा नसला, तरी ही गोष्ट त्यांनी स्वतः मला सांगितली होती. कमला दास या सुप्रसिद्ध लेखिका असल्याने केरळमध्ये ‘लव्ह जिहाद’ला अनुकूल वातावरण होण्यासाठी तसे केले असावे. निकाह केल्यानंतर ते दोघे एकत्र राहिले नाहीत.’ – सौ. लीला मेनन, संपादिका, जन्मभूमी (मल्याळम दैनिक).

संदर्भ : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ ‘लव्ह जिहाद’