हिंदूंनो, तुमची ही स्थिती करणार्यांना धडा शिकवण्याचे धाडस कोणत्याही राजकीय पक्षांकडे नाही, त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध व्हा !
हाल पुलवामा (जम्मू-कश्मीर) : वर्ष २००८ मध्ये मनमोहनसिंह पंतप्रधान असतांना केंद्रशासनाने काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी १ सहस्र ६०० कोटी रुपयांची एक योजना कार्यान्वित केली होती. त्यात राज्यशासनाने १ सहस्र ५०० निर्वासितांन शासकीय नोकरी देऊन त्यांच्या निवासासाठी घरे बांधली होती. सध्या तिथे १०० हिंदू त्यांच्या कुटुंबासह आतंकवाद्यांच्या आणि देशद्रोही मुसलमानांच्या दहशतीखाली जीव मुठीत धरून रहात आहेत.
१. या हिंदूंची स्थिती कारागृहात रहाण्यासारखी झाली आहे. त्यांना आणि त्यांच्या बायका-मुलांना भीतीने घराच्या बाहेर पडता येत नाही. काश्मीरमध्ये एखादा आतंकवादी ठार झाला की या हिंदूंंच्या घरावर दगडफेक होते. या निवासी संकुलाला उंच भिंतीचे कुंपण असले तरी बाहेरून दिल्या जाणार्या धमक्या हादरून टाकतात.
२. हे हिंदू आधी जम्मू येथील एका खोलीच्या तात्पुरत्या निवासात रहात होते. आता काश्मीरमध्ये येऊनही त्यांना तात्पुरत्याच निवासस्थानात रहावे लागत आहे. विस्थापित होण्याआधीचे त्यांचे मूळ निवासस्थान तेथून लांब आहे. मात्र तिथे भेट देण्याचे धैर्य त्यांच्यात नाही. त्यामुळे त्यांची स्थिती नजरकैदेत असल्यासारखी झाली आहे.
३. निवास संकुलाबाहेर तरुण मुले भारतका जो साथ देगा, वह गद्दार है अशा घोषण देत असतांना कुणाला सुरक्षित वाटेल ?, असा प्रश्न एका हिंदूने केला.
४. हिंदूंना त्यांची मते मांडता येत नाहीत, महिलांना नाईलाजाने बुरखा घालून फिरावे लागते. तेथील देशद्रोही पाकिस्तान आणि स्वातंत्र्याच्या घोषण देतात; मात्र हिंदूंना त्यांचे राष्ट्रप्रेम व्यक्त करता येत नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात