भुकेला अन्न नसतांना घर हवे, यासाठी आरडाओरडा करणे

आतंकवाद्यांमुळे हिंदूंच्या ऐक्याची नितांत आवश्यकता असतांना, तसेच देशापुढे अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असता स्त्रियांच्या मंदिरातील प्रवेशावर आंदोलन करणे, म्हणजे भुकेला अन्न नसतांना घर हवे, यासाठी आरडाओरडा करणे !

साम्यवादाची निरर्थकता !

‘सर्वांना एकवेळ सारखे पैसे देता येतील; पण शारीरिक प्रकृती, स्वभाव, बुद्धीमत्ता इत्यादी सर्वांना समान देता येईल का ? असे आहे, तर ‘साम्यवाद’, या शब्दात काही अर्थ आहे का ?’

भारताच्या कल्याणासाठी झटणारे अश्‍वमेधयाजी प. पू. नाना काळे !

कुठे भारतावर वरुणदेवाची कृपा व्हावी; म्हणून काहीच न करणारे प्रशासन, तर कुठे यासाठी बारा ज्योतिर्लिंगे आणि अन्य ठिकाणी यज्ञ करत असलेले श्री योगीराज वेद विज्ञान आश्रमाचे बार्शी, जिल्हा सोलापूर येथील अश्‍वमेधयाजी नाना काळे !